शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

५६० पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:25 IST

महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़

ठळक मुद्देथकीत वीजबील : ३५१ ग्राहकांकडून २ कोटी ८ लाखांचा भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़मागील अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने महावितरणच्या वतीने राज्यात ‘शून्य थकबाकी मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड मंडळाच्या वतीने माहे फेब्रुवारीमध्ये जोरदार वसुली मोहीम राबविण्यात आली. १२ पथकांच्या माध्यमांतून विविध विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाखांचा भरणा केला आहे.नांदेड जिल्ह्यातील दोन हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहक असलेल्या पाणीपुरवठा योजनांकडे १५१ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही चालू देयक तसेच थकबाकीची रक्कम न भरणाºया पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई हाती घेतली़ ५ फेब्रूवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आजपर्यंत भोकर विभागातील २१७ योजनांचा ४ कोटी ७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच देगलूर विभागातील ६८ योजनांचा १ कोटी ७१ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी, नांदेड शहर विभागातील ९१ योजनांचा १ कोटी ७२ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आणि नांदेड ग्रामीण विभागातील १६२ योजनांचा ५ कोटी ७७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर उच्चदाब ग्राहक असलेल्या २२ योजनांचा ४५ कोटी १३ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३५१ पाणीपुरवठा योजनांनी थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत २ कोटी ८ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये भोकर विभागाच्या ६७ योजनांचा ३ लाख, देगलूर विभागाच्या ६१ योजनांचा ४ लाख, नांदेड ग्रामीण विभागातील २०२ योजनांनी १२ लाख तसेच उच्चदाब ग्राहक असलेल्या २० ग्राहकांनी १ कोटी ८९ लाख रूपयांचा भरणा केला आहे.मार्च अखेर पर्यंत थकबाकी वसुली मोहिम अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही महावितरणने दिला आहे़