शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

५६० पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:25 IST

महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़

ठळक मुद्देथकीत वीजबील : ३५१ ग्राहकांकडून २ कोटी ८ लाखांचा भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़मागील अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने महावितरणच्या वतीने राज्यात ‘शून्य थकबाकी मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड मंडळाच्या वतीने माहे फेब्रुवारीमध्ये जोरदार वसुली मोहीम राबविण्यात आली. १२ पथकांच्या माध्यमांतून विविध विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाखांचा भरणा केला आहे.नांदेड जिल्ह्यातील दोन हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहक असलेल्या पाणीपुरवठा योजनांकडे १५१ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही चालू देयक तसेच थकबाकीची रक्कम न भरणाºया पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई हाती घेतली़ ५ फेब्रूवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आजपर्यंत भोकर विभागातील २१७ योजनांचा ४ कोटी ७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच देगलूर विभागातील ६८ योजनांचा १ कोटी ७१ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी, नांदेड शहर विभागातील ९१ योजनांचा १ कोटी ७२ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आणि नांदेड ग्रामीण विभागातील १६२ योजनांचा ५ कोटी ७७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर उच्चदाब ग्राहक असलेल्या २२ योजनांचा ४५ कोटी १३ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३५१ पाणीपुरवठा योजनांनी थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत २ कोटी ८ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये भोकर विभागाच्या ६७ योजनांचा ३ लाख, देगलूर विभागाच्या ६१ योजनांचा ४ लाख, नांदेड ग्रामीण विभागातील २०२ योजनांनी १२ लाख तसेच उच्चदाब ग्राहक असलेल्या २० ग्राहकांनी १ कोटी ८९ लाख रूपयांचा भरणा केला आहे.मार्च अखेर पर्यंत थकबाकी वसुली मोहिम अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही महावितरणने दिला आहे़