शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

एसटीच्या ५५ हजार फेऱ्या लवकरच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

राज्यात काेराेनापूर्वी दरदिवशी एसटीच्या ८५ हजार फेऱ्या हाेत हाेत्या. सध्या लांब पल्ला, जिल्हा ते तालुका आणि तालुका ते तालुका, ...

राज्यात काेराेनापूर्वी दरदिवशी एसटीच्या ८५ हजार फेऱ्या हाेत हाेत्या. सध्या लांब पल्ला, जिल्हा ते तालुका आणि तालुका ते तालुका, अशा सुमारे ३० हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही. हा प्रतिसाद वाढताच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढील टप्प्यात तालुका ते व्यापारी केंद्र असलेली बाजाराची माेठी गावे व नंतर गाव ते गाव एसटीने जाेडले जाणार आहे. गावागावांत जाणारी एसटी फेरीच बंद असल्याने त्या माध्यमातून जाणाऱ्या वृत्तपत्रांची पार्सलेही सुमारे दीड वर्षापासून जाणे बंद आहे; परंतु पुढील दाेन आठवड्यांत एसटी गावागावांत पाेहाेचणार असून, वृत्तपत्रांचे पार्सलही गावात पाेहाेचण्याचा मार्ग सुकर हाेणार आहे.

प्रतिकिमी २२ रुपयांचे डिझेल

प्रवासी नसल्याने एसटीच्या फेऱ्या वाढविणे व्यवहार्य नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेलचे दर ९० रुपयांवर गेले आहेत. एसटीला प्रतिकिमी २० ते २२ रुपयांचे डिझेल लागते आहे. कामगार- कर्मचारी तेवढेच आहेत, कमी प्रवाशांत एसटी चालविली तरी नुकसान आहे. खर्च तेवढाच आणि उत्पन्न कमी अशी स्थिती आहे.

उत्पन्न २२ काेटींवरून साडेसात काेटी

एसटी महामंडळ आधीच प्रचंड ताेट्यात आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे एसटी जवळजवळ बंदच असल्याने हा ताेटा वाढला आहे. एसटीचे पूर्वी दर दिवशीचे उत्पन्न २२ काेटी एवढे हाेते. आता अनलाॅकनंतर ३० हजार फेऱ्या सुरू झाल्याने हे उत्पन्न साडेसात काेटीपर्यंत पाेहाेचले आहे.

काेट......

प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. या माध्यमातून एसटीचा ताेटा कमी करण्याचा प्रयत्न आहे. ३० हजार फेऱ्या सध्या सुरू आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून लवकरच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही सुरू केल्या जाणार आहेत.

- संजय सुपेकर,

महाव्यवस्थापक,

एसटी वाहतूक, मुंबई-२