शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

नांदेड जिल्ह्यात मुद्रा योजनेद्वारे ४४९ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०१७ अखेर ११ हजार ९१४ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपात महाराष्टÑ देशात तिसºया क्रमांकावर असल्याचे सांगत एकट्या नांदेड जिल्ह्यात सुमारे साडेचारशे कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.शिशू गटामध्ये एक लाख ३२ हजार ११६ प्रकरणांत ३१७ कोटी ६५ लाख रूपये, किशोर गटाच्या तीन हजार ३०४ प्रकरणांमध्ये ७९ कोटी २० लाख रूपये आणि तरूण गटात ७०९ प्रकरणांत ५२ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या एक लाख ३६ हजार १२९ एवढी असून याद्वारे ४४९ कोटी १ लाख रूपये विविध बँकांद्वारे उद्योगासाठी दिल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.कर्जवाटपामध्ये एसबीआय अ‍ॅण्ड असोसिएट बँकेने १ हजार २४५ प्रकरणे केली असून त्यांनी ३६ कोटी पाच लाख रूपये, पब्लिक सेक्टर बँकेने दोन हजार ११६ प्रकरणांद्वारे ६२ कोटी ७२ लाख तर प्रायव्हेट सेक्टर बँकेने ७४ हजार ३० प्रकरणांत १९८ कोटी एक लाख रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच रिजनल रूरल बँकेने एक हजार २७९ प्रकरणे करून २६ कोटी ९५ लाख, एनबीएफसी-मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूटने ५७ हजार ४५९ प्रकरणात १२५ कोटी २९ लाख अशी एकूण १ लाख ३६ हजार १२९ प्रकरणांत ४४९ कोटी एक लाख इतक्या रक्कमेचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, मानव विकास यंत्रणेचे नियोजन अधिकारी डी.बी. सुपेकर, उद्योजक सतीश सामंते, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनबैठकीत मुद्रा योजनेशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. गरजू आणि बेरोजगार तरूणांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शहराबरोबरच ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम तसेच आदिवासी भागात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी संबंधित यंत्रणेला केले आहे.