शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

नांदेड जिल्ह्यात मुद्रा योजनेद्वारे ४४९ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०१७ अखेर ११ हजार ९१४ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपात महाराष्टÑ देशात तिसºया क्रमांकावर असल्याचे सांगत एकट्या नांदेड जिल्ह्यात सुमारे साडेचारशे कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.शिशू गटामध्ये एक लाख ३२ हजार ११६ प्रकरणांत ३१७ कोटी ६५ लाख रूपये, किशोर गटाच्या तीन हजार ३०४ प्रकरणांमध्ये ७९ कोटी २० लाख रूपये आणि तरूण गटात ७०९ प्रकरणांत ५२ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या एक लाख ३६ हजार १२९ एवढी असून याद्वारे ४४९ कोटी १ लाख रूपये विविध बँकांद्वारे उद्योगासाठी दिल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.कर्जवाटपामध्ये एसबीआय अ‍ॅण्ड असोसिएट बँकेने १ हजार २४५ प्रकरणे केली असून त्यांनी ३६ कोटी पाच लाख रूपये, पब्लिक सेक्टर बँकेने दोन हजार ११६ प्रकरणांद्वारे ६२ कोटी ७२ लाख तर प्रायव्हेट सेक्टर बँकेने ७४ हजार ३० प्रकरणांत १९८ कोटी एक लाख रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच रिजनल रूरल बँकेने एक हजार २७९ प्रकरणे करून २६ कोटी ९५ लाख, एनबीएफसी-मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूटने ५७ हजार ४५९ प्रकरणात १२५ कोटी २९ लाख अशी एकूण १ लाख ३६ हजार १२९ प्रकरणांत ४४९ कोटी एक लाख इतक्या रक्कमेचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, मानव विकास यंत्रणेचे नियोजन अधिकारी डी.बी. सुपेकर, उद्योजक सतीश सामंते, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनबैठकीत मुद्रा योजनेशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. गरजू आणि बेरोजगार तरूणांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शहराबरोबरच ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम तसेच आदिवासी भागात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी संबंधित यंत्रणेला केले आहे.