शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सत्र न्यायालयात २५ टक्केही खटल्यांमध्ये शिक्षा हाेत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

नांदेड : न्यायालयात दाखल हाेणाऱ्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नरत आहे. त्यासाठी विविध उपाययाेजनाही केल्या जात ...

नांदेड : न्यायालयात दाखल हाेणाऱ्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नरत आहे. त्यासाठी विविध उपाययाेजनाही केल्या जात आहेत; परंतु त्यानंतरही सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या आव्हानात्मक गुन्ह्यांतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणांत आराेपी निर्दाेष सुटत आहेत. शिक्षेचे सरासरी प्रमाण अद्याप २५ टक्क्यांवरही पाेहाेचले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

नांदेड पाेलीस परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगाेली या चार जिल्ह्यांत जानेवारी ते जून २०२० आणि २०२१ ची तुलना केल्यास काही प्रकरणांत शिक्षेचे प्रमाण वाढलेले दिसते. यावर्षी सत्र न्यायालयांमधील खटल्यांत शिक्षेचे प्रमाण केवळ १४ टक्के एवढे आहे, तर प्रथम श्रेणी न्यायालयामधील हे प्रमाण ४१ टक्के आहे. भादंविच्या गुन्ह्यात ४४ टक्के, तर स्थानिक कायद्यांतर्गत हे प्रमाण २२ टक्के आहे. दाेन्ही प्रकारच्या गुन्ह्यांतील दाेष सिद्धीचे प्रमाण सरासरी ३८ टक्के एवढे नाेंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८ टक्क्यांनी वाढले आहे. परभणी व लातूर जिल्ह्यांत मात्र दाेषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वर्षभरात घटल्याचे दिसून येते.

पाेलीस घेताहेत काेराेनाचा आडाेसा

दाेषसिद्धी व शिक्षेचे हे प्रमाण घटण्यातील हे अपयश सदाेष पाेलीस तपासाचे की सरकारी वकिलांचे? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आराेपी निर्दाेष सुटण्यामागे सरसकट फिर्यादी, पंच, साक्षीदार फितूर हाेणे ही कारणे पुढे केली जातात. या घटकांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक न्यायालयात पाेलिसांना पैरवी अधिकारी म्हणून नेमले गेले आहे. पाेलीस मात्र या अपयशासाठी यावर्षी काेराेना व लाॅकडाऊनमुळे न्यायालयाचे न चाललेले कामकाज हे प्रमुख कारण पुढे करीत आहेत.

चाैकट...

राज्यभर स्थिती सारखीच

राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सत्र व प्रथम श्रेणी न्यायालयात चालणाऱ्या भादंवि व स्थानिक कायद्यांच्या खटल्यांमध्ये शिक्षेच्या प्रमाणाची स्थिती गंभीर आहे. ती वाढविण्यासाठी शासनाकडून हाेणारे प्रयत्नही थिटे पडत आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्याचे शिक्षेचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी निर्दाेष सुटणाऱ्यांची संख्या पाहता ते समाधानकारक नाही. नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

काेट....

शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यासाठी त्रुटीमुक्त दाेषाराेपपत्र दाखल करण्यावर भर आहे. न्यायालयात नेमलेल्या पैरवी अधिकाऱ्यांची उपयाेगिताही खटल्यांच्या कामकाजात सिद्ध हाेते आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दाेषसिद्धीचे प्रमाण वाढलेलेच आहे.

-निसार तांबाेळी,

विशेष पाेलीस महानिरीक्षक,

नांदेड