शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या २१पैकी २ प्रस्तावांना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

शेतकऱ्यांना शेतीकामे करताना तिन्ही ऋतूंत विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शेतीत राबत असताना किंवा शेतीसंबंधी कामे करताना शेतकऱ्यांचे अपघाताने ...

शेतकऱ्यांना शेतीकामे करताना तिन्ही ऋतूंत विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शेतीत राबत असताना किंवा शेतीसंबंधी कामे करताना शेतकऱ्यांचे अपघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांनी शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवते. कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अपघातग्रस्त कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन भरत असते. तालुक्यातील आलेगाव, संगमवाडी, घागरदरा, पेठवडज, गऊळ, पानभोसी, शिराढोण, संगुचीवाडी, मंगलसांगवी, गंगनबीड, तेलूर, मरशिवणी, उदातांडा, औराळ, मोहिजा, बिंडा, भेंडेवाडी, बाचोटी आदी गावांतील प्रत्येकी एका लाभार्थ्याला मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत घडलेल्या घटनेचे प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.

९२पैकी ४५ शेतकरी कुटुंबाला लाभ

तालुक्यातून आतापर्यंत ७५ प्रस्ताव योजनेसाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ४५ प्रस्ताव मंजूर झाले. २०२०मधील २१ प्राप्त प्रस्तावांपैकी फक्त २ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. १२ प्रस्ताव संबंधित कंपनीस्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ६ प्रस्ताव त्रुटीत, तर १ प्रस्ताव मार्गदर्शक सूचनेप्रमाणे निकषात नसल्याने पात्र ठरत नाही, असे समजते. मागील वर्षी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई - वडील, पती - पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी) योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

चौकट - शेतकऱ्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास तालुका कृषी कार्यालयात घटनेपासून ४५ दिवसांत विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करावा. योजनेची व्याप्ती २०१९-२०२० पासून शासनाने वाढविली आहे. खातेदार असलेल्या शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्याचा समावेश योजनेत केला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव अपघातात निकामी झाले तर २ लाख रुपये आणि एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते.

- रमेश देशमुख (तालुका कृषी अधिकारी, कंधार.)