शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

१०४ विविध कार्यकारी सोसायट्या डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा ...

किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अनिष्ट तफावतमध्ये गेल्या. त्यामुळे किनवट तालुक्यातील १०४ संस्थांच्या मार्फत खूप कमी कर्जपुरवठा झाल्याने अलीकडच्या काळात या संस्था डबघाईस आल्या.

किनवट तालुक्यात ८५ सेवा सहकारी संस्था व १९ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा १०५ सहकारी संस्था असून ३६ हजार ७६८ सभासद संख्या आहे. या अगोदर सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहा टक्के दराने पीक कर्ज देण्यात येत होते. त्यामुळे बँकेत रेलचेल व्हायची. मात्र बँक डबघाईस आल्याने व्यवहार ठप्प होऊन सेवा सहकारी संस्थेचा सभासद वर्ग राष्ट्रीयीकृत बँकेकडे वळला. केवळ सातबाऱ्यावर होणाऱ्या पीक कर्जाच्या कामांना आता सर्वच कागदपत्रे द्यावी लागत आहेत. कर्ज वाटपाचे सहकारी बँकेचे धोरण संचालक मंडळ ठरवत असत. यातून सभासदांना कर्जाचा पुरवठा बँक करीत होती. आता बँक डबघाईला आल्याने कर्ज वाटप खूप कमी प्रमाणात झाले. त्यामुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली.

किनवट तालुक्यात आदिवासी सहकारी संस्था १९ नोंदणीकृत असून चांगल्या कर्जपुरवठा करणाऱ्या माळबोरगाव, चिखली, मांडवी, इस्लापूर, बोधडी या होत्या. याशिवाय मोहपूर, पाटोदा, राजगड, घोटी, कोठारी (चि.), पार्डी खु., उमरी बाजार, सारखणी, जवरला, मांडवा की., लिंगी, कनकी, कुपटी, जलधरा, बेल्लोरी धा. या आहेत. आदिवासी विविध सहकारी संस्थेचे १२ हजार ७०५ सभासद आहेत. तर नोंदणीकृत ८५ सेवा सहकारी संस्थेचे २४ हजार ६३ सभासद आहेत. एकूण आकडा ३६ हजार ७६८ च्या घरात जातो.

सहायक निबंधक कार्यालय सहकारी संस्था किनवट अंतर्गत एनडीसी बँकेने खरीप हंगाम २०२०-२०२१ मध्ये २९९० सभासद शेतकऱ्यांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. सभासदांचा आकडा पाहता आजही १०४ संस्थेच्या ३३ हजार ७६८ सभासदांना पीक कर्जाचा पुरवठा झाला नसल्याचे दिसून येते. नांदेड जिल्हा सहकारी बँकेला चांगले दिवस आणण्यासाठी व अनिष्ट तफावतीमुळे सोसायट्या कर्जपुरवठा करत नसल्याने यापुढे सोसायट्यांनी सहकारी बँकेमार्फत कर्जपुरवठा करून बँकेचे व सहकारी संस्थांचे वैभव पूर्वीप्रमाणेच बहाल करावे अशी मागणी होत आहे.