शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

१०४ विविध कार्यकारी सोसायट्या डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा ...

किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अनिष्ट तफावतमध्ये गेल्या. त्यामुळे किनवट तालुक्यातील १०४ संस्थांच्या मार्फत खूप कमी कर्जपुरवठा झाल्याने अलीकडच्या काळात या संस्था डबघाईस आल्या.

किनवट तालुक्यात ८५ सेवा सहकारी संस्था व १९ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा १०५ सहकारी संस्था असून ३६ हजार ७६८ सभासद संख्या आहे. या अगोदर सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहा टक्के दराने पीक कर्ज देण्यात येत होते. त्यामुळे बँकेत रेलचेल व्हायची. मात्र बँक डबघाईस आल्याने व्यवहार ठप्प होऊन सेवा सहकारी संस्थेचा सभासद वर्ग राष्ट्रीयीकृत बँकेकडे वळला. केवळ सातबाऱ्यावर होणाऱ्या पीक कर्जाच्या कामांना आता सर्वच कागदपत्रे द्यावी लागत आहेत. कर्ज वाटपाचे सहकारी बँकेचे धोरण संचालक मंडळ ठरवत असत. यातून सभासदांना कर्जाचा पुरवठा बँक करीत होती. आता बँक डबघाईला आल्याने कर्ज वाटप खूप कमी प्रमाणात झाले. त्यामुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली.

किनवट तालुक्यात आदिवासी सहकारी संस्था १९ नोंदणीकृत असून चांगल्या कर्जपुरवठा करणाऱ्या माळबोरगाव, चिखली, मांडवी, इस्लापूर, बोधडी या होत्या. याशिवाय मोहपूर, पाटोदा, राजगड, घोटी, कोठारी (चि.), पार्डी खु., उमरी बाजार, सारखणी, जवरला, मांडवा की., लिंगी, कनकी, कुपटी, जलधरा, बेल्लोरी धा. या आहेत. आदिवासी विविध सहकारी संस्थेचे १२ हजार ७०५ सभासद आहेत. तर नोंदणीकृत ८५ सेवा सहकारी संस्थेचे २४ हजार ६३ सभासद आहेत. एकूण आकडा ३६ हजार ७६८ च्या घरात जातो.

सहायक निबंधक कार्यालय सहकारी संस्था किनवट अंतर्गत एनडीसी बँकेने खरीप हंगाम २०२०-२०२१ मध्ये २९९० सभासद शेतकऱ्यांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. सभासदांचा आकडा पाहता आजही १०४ संस्थेच्या ३३ हजार ७६८ सभासदांना पीक कर्जाचा पुरवठा झाला नसल्याचे दिसून येते. नांदेड जिल्हा सहकारी बँकेला चांगले दिवस आणण्यासाठी व अनिष्ट तफावतीमुळे सोसायट्या कर्जपुरवठा करत नसल्याने यापुढे सोसायट्यांनी सहकारी बँकेमार्फत कर्जपुरवठा करून बँकेचे व सहकारी संस्थांचे वैभव पूर्वीप्रमाणेच बहाल करावे अशी मागणी होत आहे.