शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

राज्यातील जि.प. ८५, पं.स.च्या ११६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८५ जिल्हा परिषदेच्या व ११६ पंचायत समितीच्या जागा रिक्त ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८५ जिल्हा परिषदेच्या व ११६ पंचायत समितीच्या जागा रिक्त केल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांचा लवकरच निवडणूक कार्यक्रम आयोग जाहीर करणार आहे. आयोगाने यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

रिक्त झालेल्या ८५ सदस्यांमध्ये नागपूर, धुळे, वाशीम, पालघर, नंदूरबार व अकोला जिल्हा परिषदेचा समावेश आहे. या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली होती. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसवावे, असे आदेश राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्के आरक्षणातून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वजा करून उरलेल्या टक्केवारीत ओबीसींचे आरक्षण बसवावे असे स्पष्ट केले असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या सहाही जिल्हा परिषदेच्या व ४४ पंचायत समितीच्या सदस्यांचे सदस्यत्व ४ मार्चपासून रद्द केले. त्या संदर्भातील पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, ९ तारखेपर्यंत संबंधित सदस्यांना कळवावे व त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा, असे आयोगाने आदेशित केले आहे. आयोग या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार आहे.

- सहा जिल्हा परिषदेत ओबीसींच्या रिक्त झालेल्या जागा

नागपूर - १६

पालघर - १५

धुळे - १५

अकोला - १४

वाशीम - १४

नंदूरबार - ११