शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

डीपीसी निधीसाठी जि.प.ला उपयोगिता प्रमाणपत्र आवश्यक

By admin | Updated: April 30, 2017 01:49 IST

तीर्थक्षेत्र विकास, रस्त्यांचे बांधकाम, जलयुक्त शिवार अशा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी गेल्या दोन वर्षात ....

पालकमंत्र्यांचे निर्देश, कामकाजावर नापसंती : दोन वर्षांचा निधी अजूनही अखर्चितनागपूर : तीर्थक्षेत्र विकास, रस्त्यांचे बांधकाम, जलयुक्त शिवार अशा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी गेल्या दोन वर्षात जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीपैकी बऱ्याच अंशी निधी जि.प.ने खर्च केला नाही, याबद्दल पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत यापुढे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय डीपीसीचा निधी मिळणार नाही, असे खडेबोल जि.प. प्रशासनाला सुनावले.रविभवनात विविध विषयांवरील बैठकींमध्ये पालकमंत्र्यांनी वरील निर्णय घेतला. या बैठकीला आ. सुनील केदार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण उपस्थित होते. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत अजूनही २०१४-१५, २०१५-१६, आणि २०१६-१७ ची बांधकामे पूर्ण झाली नाहीत. या कामांबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कामाचा दर्जा चांगला नाही, कुणीही कामाची तपासणी करीत नाही. तीन वर्षापासून रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. यापूर्वीची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा नवीन कामे दिली जात आहेत, यावर आक्षेप घेण्यात आला.जोपर्यंत जुना निधी खर्च होणार नाही, तोपर्यंत नवीन निधी मिळणार नाही. दोन वर्षाच्या सर्व कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करा. येत्या ३० मेपर्यंत कामे पूर्ण झाल्याचे हे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय निधी देऊ नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले. तसेच नियोजन अधिकाऱ्यांनी आपण दिलेल्या निधीची कामे सुरु आहेत की नाही हे तपासावे. कामापूर्वीचे व नंतरचे फोटो ताब्यात घ्यावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.तीर्थक्षेत्र विकासाची कामे करताना वन विभागातर्फे कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यात येतात अशी तक्रार करण्यात आली.या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तीर्थक्षेत्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाची आठवण करून देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने अडथळे न आणण्याचे मान्य केले. जि.प. सिंचन विभागाला मागील वर्षी २५ कोटी रुपये देण्यात आले. हा पूर्ण निधी अजूनही खर्च झाला नाही, याकडेही या बैठकीत लक्ष वेधण्यात आले.(प्रतिनिधी)जेसीबी ४ महिन्यांपासून नादुरुस्तजलयुक्त शिवार अंतर्गत खोदकामासाठी देण्यात आलेले जेसीबी मशीन आणि टिप्पर ४ महिन्यांपासून नादुरुस्त असून हे दुरुस्त करण्यासाठी जि.प.कडे निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले. यापूर्वी अंदाजपत्रकात या मशीनच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश असतानाही अशी तरतूद करण्यात आली नाही. येत्या १५ दिवसात या मशीन दुरुस्त झाल्या नाहीत तर त्या शासनाकडे जमा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जेसीबी व टिप्पर नादुरुस्त असल्याकडे आ. सुनील केदार यांनी लक्ष वेधले होते.