शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. व नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा रोवणार

By admin | Updated: July 1, 2016 03:07 IST

नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा निर्धार : पहिली लढाई भाजप विरोधातनागपूर : नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत जुने काँग्रेसी, युवा कार्यकर्ते, महिला आदींना सोबत घेऊन गावागावात प्रत्येक बुथवर पक्षाची बांधणी केली जाईल. गटबाजी, मतभेद बाजूला सारून प्रसंगी एक पाऊल मागे येण्याची तयारी ठेवून सर्वांना विश्वासाने सोबत घेतले जाईल. आपली पहिली लढाई भाजपसोबत आहे. या लढ्यात सर्व काँग्रेसींना सहभागी करून आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवणे हे आपले पहिले लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. केंद्र, राज्यात व जिल्हा परिषदेतही भाजपची आहे. शिवाय भाजपचे केंद्र व राज्यातील हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर तगडे आव्हान असून सत्ता गाठण्याची वाट वाटते तेवढी सोपी नाही. अशा कठीण राजकीय परिस्थितीत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या आव्हानांबाबत मुळक यांच्याशी बातचीत केली असता काँग्रेसचा कार्यकर्ता एकदिलाने जागा झाला तर काहीच कठीण नाही, अशी आत्मविश्वास व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुळक म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्या की गावातील कार्यकर्ता ताकदीने नेत्याच्या पाठीमागे उभा राहतो. दिवसरात्र काम करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे त्या निवडणुकीत नेत्यांनीही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये तसा विश्वास निर्माण करायचा आहे. एकदा हा विश्वास निर्माण झाला की कुठलीही निवडणूक जिंकणे कठीण नाही. भाजपने सत्तेत येताना शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र, ती आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या सर्व घटकांपर्यंत पोहचून त्यांना भाजपकडून होत असलेली दिशाभूल पटवून दिली जाईल. भाजपच्या अव्यावहारिक व फसव्या घोषणा जनतेसमोर मांडल्या जातील. काँग्रेसचा आपले हित साधू शकते हा विश्वास पुन्हा एकदा ग्रामीण जनतेत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील समविचारी पक्षाशी चर्चा करून, प्रसंगी त्यांना एकत्र करून भाजप विरोधातील लढ्याला कसे बळ देता येईल, यासाठी रणनीती आखली जाईल, असेही मुळक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)