शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांतील ‘विश्वास’ संकटात

By admin | Updated: July 7, 2014 01:08 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाच्या संशोधन व मूल्यमापन उपक्रमांतर्गत विश्वास प्रकल्प सुरू केला होता. केंद्रप्रमुख शाळांना

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाच्या संशोधन व मूल्यमापन उपक्रमांतर्गत विश्वास प्रकल्प सुरू केला होता. केंद्रप्रमुख शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पटसंख्येची दैनंदिन माहिती श्क्षिण विभागाला आॅनलाईन पाठवत होते. परंतु शासन मंजुरी नसल्याने हा प्रकल्प संकटात सापडला आहे. शैक्षणिक दर्जात सुधारणा व्हावी, पटसंख्येत वाढ व्हावी या हेतूने जि.प.चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी २०१२ मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता. संशोधन व मूल्यमापन प्रकल्पांर्गत यासाठी खर्चाची तरतूद केली होती. मागील दोन वर्षांत यावर आठ लाखांचा खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील ११७ केंद्रप्रमुखांना मोबाईल टॅब देण्यात आले होते. त्यांनी दररोज किती शाळांना भेटी दिल्या. शाळेतील पटसंख्या व उपस्थिती याची सचित्र माहिती शिक्षण विभागाला मिळणे अपेक्षित होते. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या कामकाजावर शिक्षण विभागाचे नियंत्रण होते. सुरुवातीला शिक्षकांची उपस्थितीही वाढली होती. परंतु काही तालुक्यात नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने अहवाल मिळत नव्हता. प्रकल्पाच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१४ ला संपली आहे. त्यामुळे ही यंत्रणा लवकरच ठप्प पडण्याची शक्यता आहे.प्रकल्प राबविताना जि.प. प्रशासनाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची मंजुरी घेणे गरजेचे होते. मंजुरी नसल्याने कोणत्या शीर्षकाखाली यावर खर्च करावा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. शुक्र वारी सर्वशिक्षा अभियान समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. परंतु मार्ग न निघाल्याने हा प्रकल्प संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)