शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

खेडोपाडी ज्ञानाची गंगा पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषदेला विद्यार्थी मिळेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

नागपूर : ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया रचणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना गेल्या काही वर्षात विद्यार्थीच मिळेनासे झाले आहेत. आजच्या घडीला ...

नागपूर : ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया रचणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना गेल्या काही वर्षात विद्यार्थीच मिळेनासे झाले आहेत. आजच्या घडीला ५१४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट २० पेक्षाही कमी आहे. कधीकाळी खचाखच भरणाऱ्या वर्गामध्ये गेल्या काही वर्षात शुकशुकाट पसरला आहे. आता सरकार कमी पटसंख्येच्या शाळाही गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांवर आलेल्या या विदारक परिस्थितीला जबाबदार तरी कुणाला धरायचे.

शासनाच्या नियमानुसार एक शाळा दोन शिक्षक असे गणित जिल्हा परिषदेच्या शाळांचे आहे. मग २ विद्यार्थी का असेनात २ शिक्षकांची तिथे नियुक्ती करण्यात येते. पण जेवढे विद्यार्थी कमी तेवढी गुणवत्ता अधिक असे समीकरण मांडले जाते. कमी पटसंख्येच्या शाळेत उलट होत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांची गुणवत्ता आणखी घसरत चालली आहे. कारण कमी पटसंख्या शाळांना शिकविण्याची मानसिकता शिक्षकांची राहिली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

शालेय शिक्षण विभागाने वर्षभरापूर्वी १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची याची प्रसिद्ध केली आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांचा समावेश होता. शासन या शाळांचे समायोजन करणार असे संकेत होते. समायोजनाचा अर्थच शाळा बंद होणार हे निश्चित. प्रत्येक शाळेत दोन शिक्षक नियुक्त आहेत. त्यामुळे शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे, या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत.

- शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा

जिल्हा परिषदेच्या ५१४ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. पण यातील ३२ शाळांचा पट १ ते ५ विद्यार्थ्यांचा आहे. तर १३४ शाळांमध्ये फक्त १० विद्यार्थ्यांचा पट आहे. उरलेल्या ३४८ शाळांमध्ये १ ते ८ ची विद्यार्थी संख्या २० पर्यंत आहे. पटसंख्येचा घसरता आलेख गेल्या ८ ते १० वर्षांपासूनचा आहे. शाळांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे.