शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

शासन निर्बंधांना जिल्हा परिषदेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST

जि.प. अध्यक्षांची शासनाकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने येत्या ३० एप्रिलपर्यंत ...

जि.प. अध्यक्षांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने येत्या ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध व प्रत्येक शनिवार व रविवारला संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे; परंतु या सर्व निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिक व मजूर वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, सदरचे निर्बंध तातडीने उठविण्यात यावे व या निर्बंधाऐवजी टप्प्याटप्प्याने सर्व व्यवसाय नियमांचे पालन करून नियमीतरीत्या सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण विकासाचे केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी गुरुवारला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

यापूर्वी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच संपूर्ण जिल्ह्याचे अर्थचक्र विस्कळीत झालेले होते. आता कुठे काही प्रमाणात जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा सर्व सामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या निर्बंधांमुळे लहान दुकानदार, दुकानात काम करणारे कामगार, हॉटेल व्यावसायिक, कर्मचारी, सलून कामगार, केटरिंग व्यवसाय, बिछायत आदी व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. निश्चितच कोरोना संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; परंतु योग्य खबरदारी, नियमांचे पालन, लसीकरण व जनजागृती करून या संकटाचा सामना करून नियमित जनजीवन सुरळीत करणेही गरजेचे असल्याचे बर्वे यांनी सांगितले.

शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, मृत्यूंचे तांडव सुरू आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनही व्यवस्था नसल्याने शहरातच रुग्णांना रेफर करण्यात येत आहे. त्यातच अनेकांचा बेडअभावीदेखील मृत्यू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण पातळीवरच तात्पुरती व्यवस्था म्हणून शाळा, समाजभवन, पीएचसी येथे कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करून तेथे आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रपरिषदेला माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी सदस्या अवंतिका लेकुरवाळे, सदस्य दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे आदी उपस्थित होते.

बॉक्स....

मध्यप्रदेशातून येणाऱ्यांवर बंदी घाला : कुंभारे

माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला मध्यप्रदेश राज्यात प्रवेश देण्यात येत नाही; परंतु महाराष्ट्रात मध्यप्रदेशामधून येणाऱ्यांसाठी असा कुठलाच नियम नाही. त्यामुळे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सीमा सील करून मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच प्रवेश देण्याचे नियोजन आखण्यात यावे.