शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तरुणाईची पसंती शासकीय नोकरीलाच

By admin | Updated: May 19, 2014 00:50 IST

काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती

नागपूर : काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती आणि सिक्युरिटीमुळे तरुणाईचा सरकारी नोकरीकडे ओढा वाढत आहे. खासगी जॉबमध्ये दांडगे वेतन मिळत असले तरी कामाचा अतिरिक्त ताणदेखील सहन करावा लागतो. शिवाय नोकरी टिकेलच याची शाश्वतीदेखील नसते. परिणामी अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमातील उच्चशिक्षित विद्यार्थीदेखील शासकीय नोकर्‍यांना पसंती देत आहेत. लाखो रुपयांचे पॅकेज देऊन खासगी कंपन्या युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. विविध महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खासगी कंपन्या आवश्यक नोकर भरती करताना दिसतात. यासाठी शिकाऊ उमेदवारांनाही तीन ते पाच लाखांपर्यंतचे पॅकेज दिले जाते. मात्र, असे असतानाही शहरातील बहुतांश महाविद्यालयीन तरुणांना दांडग्या पगाराच्या खासगी नोकर्‍यांची नव्हे तर शासनाच्या विविध विभागांतील प्रशासकीय नोकर्‍या करण्याची आवड असल्याचे विद्यार्थी सांगतात. खासगी जॉबसाठी मोठे पॅकेज मिळत असले तरी त्या तुलनेत कामाचा बोजा फार जास्त असतो. खासगी कंपन्यांकडून नोकरदारांना सिक्युरिटी दिली जात नसल्याने कंपनीप्रति कर्मचार्‍यांना आपलेपणा वाटत नाही. शिवाय कंपनी केव्हाही नोकरीवरून काढू शकते. बेरोजगारांची संख्या जास्त असल्याने खासगी क्षेत्रात कर्मचार्‍यांकडून कमी पगारात जास्त काम करून घेतले जाते. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांची गुणवत्ता तर खालावतेच; शिवाय त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक परिणामदेखील होतो. शासकीय आणि खासगी नोकर्‍यांतील चांगल्या-वाईट गोष्टींबद्दलची जाणीव, फायदे-तोटे युवकांना माहिती होत आहेत. मानसिक समाधान आणि सुरक्षा देणार्‍या नोकर्‍यांकडे आजच्या युवकांचा कल असल्याचे लक्षात येते. शासकीय नोकरीमध्ये सुविधा असतात आणि सुरक्षादेखील. वेतनासह विविध प्रकारचे भत्तेही मिळत असतात. शिवाय खासगी कंपन्यांप्रमाणे कामाचे टेन्शन, टार्गेट नसल्याने युवकांना सरकारी नोकर्‍या आकर्षित करीत आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे विविध विभागांतील पदे सरळ भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवडले जातात. यामुळे प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आली असून युवकांचा विश्वास यातून संपादन झाला आहे. शिवाय शासकीय नोकर्‍या या वशिला आणि शिफारशींऐवजी गुणवत्तेवर मिळत असल्याने तरुणाईचा अशा परीक्षा देण्याकडे कल वाढला असल्याचेही दिसून येते. (प्रतिनिधी)