शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

तरुणाईची पसंती शासकीय नोकरीलाच

By admin | Updated: May 19, 2014 00:50 IST

काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती

नागपूर : काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती आणि सिक्युरिटीमुळे तरुणाईचा सरकारी नोकरीकडे ओढा वाढत आहे. खासगी जॉबमध्ये दांडगे वेतन मिळत असले तरी कामाचा अतिरिक्त ताणदेखील सहन करावा लागतो. शिवाय नोकरी टिकेलच याची शाश्वतीदेखील नसते. परिणामी अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमातील उच्चशिक्षित विद्यार्थीदेखील शासकीय नोकर्‍यांना पसंती देत आहेत. लाखो रुपयांचे पॅकेज देऊन खासगी कंपन्या युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. विविध महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खासगी कंपन्या आवश्यक नोकर भरती करताना दिसतात. यासाठी शिकाऊ उमेदवारांनाही तीन ते पाच लाखांपर्यंतचे पॅकेज दिले जाते. मात्र, असे असतानाही शहरातील बहुतांश महाविद्यालयीन तरुणांना दांडग्या पगाराच्या खासगी नोकर्‍यांची नव्हे तर शासनाच्या विविध विभागांतील प्रशासकीय नोकर्‍या करण्याची आवड असल्याचे विद्यार्थी सांगतात. खासगी जॉबसाठी मोठे पॅकेज मिळत असले तरी त्या तुलनेत कामाचा बोजा फार जास्त असतो. खासगी कंपन्यांकडून नोकरदारांना सिक्युरिटी दिली जात नसल्याने कंपनीप्रति कर्मचार्‍यांना आपलेपणा वाटत नाही. शिवाय कंपनी केव्हाही नोकरीवरून काढू शकते. बेरोजगारांची संख्या जास्त असल्याने खासगी क्षेत्रात कर्मचार्‍यांकडून कमी पगारात जास्त काम करून घेतले जाते. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांची गुणवत्ता तर खालावतेच; शिवाय त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक परिणामदेखील होतो. शासकीय आणि खासगी नोकर्‍यांतील चांगल्या-वाईट गोष्टींबद्दलची जाणीव, फायदे-तोटे युवकांना माहिती होत आहेत. मानसिक समाधान आणि सुरक्षा देणार्‍या नोकर्‍यांकडे आजच्या युवकांचा कल असल्याचे लक्षात येते. शासकीय नोकरीमध्ये सुविधा असतात आणि सुरक्षादेखील. वेतनासह विविध प्रकारचे भत्तेही मिळत असतात. शिवाय खासगी कंपन्यांप्रमाणे कामाचे टेन्शन, टार्गेट नसल्याने युवकांना सरकारी नोकर्‍या आकर्षित करीत आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे विविध विभागांतील पदे सरळ भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवडले जातात. यामुळे प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आली असून युवकांचा विश्वास यातून संपादन झाला आहे. शिवाय शासकीय नोकर्‍या या वशिला आणि शिफारशींऐवजी गुणवत्तेवर मिळत असल्याने तरुणाईचा अशा परीक्षा देण्याकडे कल वाढला असल्याचेही दिसून येते. (प्रतिनिधी)