शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
3
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
6
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
7
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
8
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
9
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
10
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
11
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
13
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
14
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
15
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
16
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
17
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
18
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
19
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
20
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?

तरुणाईला रोजगारक्षम बनविणार

By admin | Updated: February 16, 2015 02:12 IST

नवीन योजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून ...

नागपूर : नवीन योजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून तरुणाईला रोजगारक्षम बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे मानेवाडा येथे आयोजित ‘उद्योजक क्रांती २०१५’ या महाराष्ट्र माळी उद्योजक विकास प्रदर्शन व संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने,अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, माजी आमदार अशोक मानकर, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, उद्योगपती केशवराव यावलकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महात्मा फु ले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी राज्य सरकारची सहकार्याची भूमिका आहे. याबाबतचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी उद्योजकांना प्रेरणा दिली. त्यांनी चांगल्या रूढी आणल्या. याच विचाराची आज समाजाला गरज आहे. काळाची गरज ओळखून पावले उचलण्याची गरज आहे. माळी महासंघाने प्रदर्शन व संमेलनाच्या माध्यमातून चांगला उपक्रम सुरू केला आहे. उद्योजकांना संधी उपलब्ध केली. यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी,असे आवाहन फडणवीस यांनी केले. महासंघातर्फे राज्याच्या इतर विभागात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महात्मा ज्योतिबा फुले मोठे उद्योगपती होते. त्यांच्या संस्थेने राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारले. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी शंकरराव लिंगे यांनी केली. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील १०६ उद्योजकांनी स्टॉल लावले होते. कृषी व उद्योगासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. राज्यात माळी समाजाची लोकसंख्या २.५० कोटी आहे. समाजाचे उत्पन्न वाढले तर राज्याचाही विकास होईल. यासाठी समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत अविनाश ठाकरे यांनी प्रास्ताविकातून मांडले. यावेळी उद्योगपती के.पी. राऊ त, किशोर कन्हेरे, नारायणराव बोबडे, निशिकांत भेदे, संभाजी पगारे, रवी पाटील, भानुदास बोरकर, प्रकाश बोबडे, रवींद्र आंबाडकर, प्रगती मानकर यांच्यासह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)