शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

तरुणाईला रोजगारक्षम बनविणार

By admin | Updated: February 16, 2015 02:12 IST

नवीन योजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून ...

नागपूर : नवीन योजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून तरुणाईला रोजगारक्षम बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे मानेवाडा येथे आयोजित ‘उद्योजक क्रांती २०१५’ या महाराष्ट्र माळी उद्योजक विकास प्रदर्शन व संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने,अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, माजी आमदार अशोक मानकर, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, उद्योगपती केशवराव यावलकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महात्मा फु ले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी राज्य सरकारची सहकार्याची भूमिका आहे. याबाबतचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी उद्योजकांना प्रेरणा दिली. त्यांनी चांगल्या रूढी आणल्या. याच विचाराची आज समाजाला गरज आहे. काळाची गरज ओळखून पावले उचलण्याची गरज आहे. माळी महासंघाने प्रदर्शन व संमेलनाच्या माध्यमातून चांगला उपक्रम सुरू केला आहे. उद्योजकांना संधी उपलब्ध केली. यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी,असे आवाहन फडणवीस यांनी केले. महासंघातर्फे राज्याच्या इतर विभागात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महात्मा ज्योतिबा फुले मोठे उद्योगपती होते. त्यांच्या संस्थेने राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारले. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी शंकरराव लिंगे यांनी केली. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील १०६ उद्योजकांनी स्टॉल लावले होते. कृषी व उद्योगासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. राज्यात माळी समाजाची लोकसंख्या २.५० कोटी आहे. समाजाचे उत्पन्न वाढले तर राज्याचाही विकास होईल. यासाठी समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत अविनाश ठाकरे यांनी प्रास्ताविकातून मांडले. यावेळी उद्योगपती के.पी. राऊ त, किशोर कन्हेरे, नारायणराव बोबडे, निशिकांत भेदे, संभाजी पगारे, रवी पाटील, भानुदास बोरकर, प्रकाश बोबडे, रवींद्र आंबाडकर, प्रगती मानकर यांच्यासह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)