शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

युवक काँग्रेसचा मोर्चा आक्रमक, नाना पटोलेंना उचलून नेले, केदार, राऊत, शेळकेवडेट्टीवार चढले कठड्यांवर

By सुमेध वाघमार | Updated: December 8, 2023 18:46 IST

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला.

सुमेध वाघमारे 

नागपूर : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके,  शिवानी वडेट्टीवार  यांनी कठड्यांवर चढून विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी पटोले यांच्यासह राऊत, शेळके, वडेट्टीवार यांना बळाचा वापर करीत अक्षरश: उचलून नेऊन वाहनात कोंबले.

अखिल भारतीय युवक काँग्रसेच्यावतीने बेरोजगारी, अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी, पेपर फुटी प्रकरणातील चौकशी यासह इतरही मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी अंजुमन कॉलेज मंगळवारी कॉम्प्लेक्सयेथून विधी मंडळावर मोर्चा काढण्यात आला. सुनील केदार, कुणाल राऊत, युवक बंटी शेळके, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा पोलिसांनी लिबर्टी टॉकीज चौकात कठडे लावून अडविला. त्याचवेळी केदार यांच्यासह राऊत, बंटी शेळके, वडेट्टीवार यांच्यासह काही कार्यकर्ते कठड्यांवर चढले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाजी सुरू केले. कठडे ओलांडणाºया कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्याचवेळी राऊत, शेळके, वडेट्टीवार यांनी कठड्यावरून खाली उडी मारताच पोलिसांनी त्यांना उचलून नेले.

दरम्यान नाना पटोले हे सुद्धा कठड्यांवर चढले. यामुळे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. पटोले यांनी कठडे ओलांडून रस्त्यावर ठाण मांडून बसले. पोलिसांनी त्यांचे दोन्ही हात-पाय पकडून, उचलून घेत पोलिसांच्या वाहनात बसविले. मोर्चा आक्रमक झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मोर्चातील सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही वेळातच मोर्चा माघारी फिरला. मोर्चाला आ. विकास ठाकरे, अक्षय जैन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

- बेरोजगार तरुणांचा हा आक्रोश-पटोले

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हा आक्रोश बेरोजगार तरुणांचा आहे. सरकारने महाभरतीच्या नावाने आॅनलाईन पद्धतीने तरुणांना लुटले. तरुणाईला बरबाद करण्याचे काम हे सरकार करीत आहे. महाराष्ट्रात लाखो पदे रिक्त आहेत. परंतुकंत्राटी भरतीच्या नावाने ते तरुणांचे आयुष्य बरबाद करीत आहेत. सरकारला याचं उत्तर द्यावे लागेल. हे चीटफंडवाले सरकार आहे. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही कठेडेच काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून न्याय मिळवून देऊ, असेही पटोले म्हणाले.