शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

युवक काँग्रेसचा मोर्चा आक्रमक, नाना पटोलेंना उचलून नेले, केदार, राऊत, शेळकेवडेट्टीवार चढले कठड्यांवर

By सुमेध वाघमार | Updated: December 8, 2023 18:46 IST

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला.

सुमेध वाघमारे 

नागपूर : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके,  शिवानी वडेट्टीवार  यांनी कठड्यांवर चढून विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी पटोले यांच्यासह राऊत, शेळके, वडेट्टीवार यांना बळाचा वापर करीत अक्षरश: उचलून नेऊन वाहनात कोंबले.

अखिल भारतीय युवक काँग्रसेच्यावतीने बेरोजगारी, अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी, पेपर फुटी प्रकरणातील चौकशी यासह इतरही मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी अंजुमन कॉलेज मंगळवारी कॉम्प्लेक्सयेथून विधी मंडळावर मोर्चा काढण्यात आला. सुनील केदार, कुणाल राऊत, युवक बंटी शेळके, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा पोलिसांनी लिबर्टी टॉकीज चौकात कठडे लावून अडविला. त्याचवेळी केदार यांच्यासह राऊत, बंटी शेळके, वडेट्टीवार यांच्यासह काही कार्यकर्ते कठड्यांवर चढले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाजी सुरू केले. कठडे ओलांडणाºया कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्याचवेळी राऊत, शेळके, वडेट्टीवार यांनी कठड्यावरून खाली उडी मारताच पोलिसांनी त्यांना उचलून नेले.

दरम्यान नाना पटोले हे सुद्धा कठड्यांवर चढले. यामुळे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. पटोले यांनी कठडे ओलांडून रस्त्यावर ठाण मांडून बसले. पोलिसांनी त्यांचे दोन्ही हात-पाय पकडून, उचलून घेत पोलिसांच्या वाहनात बसविले. मोर्चा आक्रमक झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मोर्चातील सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही वेळातच मोर्चा माघारी फिरला. मोर्चाला आ. विकास ठाकरे, अक्षय जैन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

- बेरोजगार तरुणांचा हा आक्रोश-पटोले

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हा आक्रोश बेरोजगार तरुणांचा आहे. सरकारने महाभरतीच्या नावाने आॅनलाईन पद्धतीने तरुणांना लुटले. तरुणाईला बरबाद करण्याचे काम हे सरकार करीत आहे. महाराष्ट्रात लाखो पदे रिक्त आहेत. परंतुकंत्राटी भरतीच्या नावाने ते तरुणांचे आयुष्य बरबाद करीत आहेत. सरकारला याचं उत्तर द्यावे लागेल. हे चीटफंडवाले सरकार आहे. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही कठेडेच काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून न्याय मिळवून देऊ, असेही पटोले म्हणाले.