शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ट्रकचालकाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केल्यानंतर खाली उतरताना तरुणाचा ताेल गेला व खाली पडल्याने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केल्यानंतर खाली उतरताना तरुणाचा ताेल गेला व खाली पडल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. ट्रकचालकाने त्याला उपचाराला नेणे अथवा दुसऱ्याला सांगण्याऐवजी तिथून पळ काढला. ही बाब काही तासांनी उघड हाेताच त्याला उपचाराला नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) वीज केंद्राच्या आवारात रविवारी (दि. १५) रात्री घडली.

मोरेश्वर मारोती बन्सोड (३२, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. माेरेश्वर व रवींद्र अजाबराव सरोदे दाेघेही एकाच गावचे रहिवासी व मित्र हाेते. त्यांनी एमएच-४०/बीजी-०७३३ क्रमांकाच्या ट्रकने वेकाेलिच्या शिंगाेरी (ता. पारशिवनी) खाणीतून खापरखेडा वीज केंद्रात काेळसा आणला हाेता. रवींद्रने वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केला. त्यावेळी केबिनमधून उतरताना माेरेश्वरचा ताेल गेला व ताे खाली पडला.

ही बाब लक्षात येताच ट्रकचालकाने त्याला जखमी अवस्थेत बाजूला केले व ट्रक घेऊन निघून गेला. काही वेळाने याच काट्यावर दुसरा ट्रक वजन करण्यासाठी आला असता, ट्रकचालकास माेरेश्वर पडला असल्याचे दिसले. त्याने याबाबत सुरक्षा रक्षक प्रमाेद नवले यांना माहिती दिली. माेरेश्वरवर चिचाेली (खापरखेडा) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे साेमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी दीपक नांद्रे यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. वृत्त लिहिस्ताे खापरखेडा पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद केली नव्हती.

...

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

वीज केंद्राच्या आवारात प्रवेश करावयाचा असल्याच परवानगी घ्यावी लागते. वीज केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, नियमित व कंत्राटी कामगारांनाही विनागेटपास आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. हाच नियम ट्रकचालकांसह इतरांनाही लागू आहे. माेरेश्वर रवींद्रसाेबत त्याच्या ट्रकच्या केबिनमध्ये बसून आत गेला. त्याच्याकडे गेटपास नसताना ताे आत गेला कसा, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.