शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:10 IST

नागपूर : काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी ...

नागपूर : काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे. सुनील थाेरात नामक हा २२ वर्षाचा तरुण सहा राज्यातून ४८५० किलाेमीटरचा प्रवास करून शुक्रवारी रात्री नागपूरला पाेहचला.

सुनील साहेबराव थाेरात हा देवळाणा, जि. औरंगाबाद येथील तरुण गावी जैविक शेती करताे. आयुष्यात एकदा आपला देश फिरावा, हे त्याचे स्वप्न पण कसे हा सवाल. एकदा औरंगाबादजवळच्या वारसा स्थळांना भेट दिली असता, तिथे झालेल्या विद्रुपीकरणाने ताे अस्वस्थ झाला. ऐतिहासिक महत्त्व असलेली ही स्थळे जतन करण्याचा संदेश लाेकांना द्यावा, असा निश्चय त्याने केला. इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते खाेटे नाही. आपले दाेन्ही स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग त्याला सापडला. २० डिसेंबर राेजी त्याने आपली सायकल उचलली आणि निघाला प्रवासाला. अर्थात घरच्यांचे पाठबळ हाेतेच साेबत पण खिशात केवळ ४५०० रुपये हाेते.

औरंगाबादहून निघाल्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू (काेईंबतूर), केरळ व कन्याकुमारी गाठली. पुढे कर्नाटक, आंध्रप्रदेश हाेत तेलंगणाचा हैदराबाद व आदिलाबादमार्गे सुनील नागपूरला पाेहचला. या प्रवासात त्याने तुळजापूर, विजापूर, बदामी, पट्टडकल, हम्पी, म्हैसूर पॅलेस, केरळचा पश्चिम घाट, इद्दुकी धरण, सबरीमाला मंदिर, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुरै (मीनाक्षी मंदिर), तिरुचिराप्पल्ली, तंजूवरचा शिलालेख, कृष्णगिरी, होसूर, बेंगळुरू तसेच हैदराबादला गोलकोंडा किल्ला, चारमीनार, सालारजंग संग्रहालय, संघी मंदिर, बिर्ला मंदिराला भेट दिली. नागपुरात दाेन दिवस मुक्कामात वारसा स्थळांना भेटी देत ताे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली हाेत मनाली, लेह लद्दाख, कारगीलमार्गे काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात भ्रमण करीत पुन्हा महाराष्ट्र गाठणार आहे. अशाप्रकारे १५ राज्यातील ८० शहरांच्या भारतीय व जागतिक वारसा स्थळांना ताे भेटी देत ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करणार आहे. असा हा १२० दिवसांचा प्रवास असून पुढल्या ५० दिवसात त्याला ६१५० किलाेमीटरचे अंतर पादाक्रांत करायचे आहे.

माझी ही सायकल राईड भारतीय सैनिकांना व पाेलिसांना समर्पित आहे. वारसा स्थळ जतन करण्यासह आराेग्य आणि पर्यावरण हाही संदेश मला द्यायचा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती कशी आहे, तिथले लोक कसे आहेत. याचा अभ्यास करायचा होता. ४५०० रुपये घेऊन निघालाे पण प्रवासात लाेकांनी खूप मदत केली.

- सुनील थाेरात, सायकल राईडर

त्या किर्र अंधारात मी एकटा

केरळच्या घाटावरून चालत असताना रात्र झाली हाेती आणि अचानक सायकल पंक्चर झाली. भाषांच्या अडथळ्यात पुढले सुरक्षित ठिकाण गाठायचे हाेते. त्या किर्र अंधारात मी सायकल ढकलत चालत हाेताे. अशावेळी त्या मार्गे जाणाऱ्या वन विभाग व पाेलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली. हैदराबादमध्ये असाच एकाने समाेर येऊन गळा दाबला हाेता. हे काही कटू प्रसंग आहेत पण बरेच चांगले अनुभव आहेत.