शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तुम्ही एक पाऊल पुढं या, आम्ही एक पाऊल मागे येतो; संदीप जोशी यांचे तुकाराम मुंढे यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:30 IST

मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.

ठळक मुद्देजनतेच्या व शहराच्या विकासासाठी दोघे मिळून काम केले तर अधिक योग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादामध्ये मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.

सोमवारी संध्याकाळी महापौरांनी आयुक्तांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि. (एनएसएसडीसीएल)च्या संचालक मंडळाची मंजुरी नसताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, एनएसएसडीसीएलच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर आणि लेखा अधिकारी अमृता देशकर यांनी संगनमताने ५० कोटीच्या निविदा जारी केल्या. तसेच कंत्राटदारांना १८ कोटीची रक्कम अदा केली. हा कंपनी कायद्याच्या कलम ४४७ नुसार गुन्हा असल्याने यासंदर्भात मुंढे यांच्यासह तिघांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापौरांनी स्वत: पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून तकार दाखल केल्याने महापालिका प्रशासनासह शहरातही खळबळ उडाली आहे.

तर माझी नियुक्ती नियमानुसार असून कोणतेही नवीन कंत्राट दिले नाही. जुने बिल दिले. सर्व व्यवहार कायदेशीर व पारदर्शी असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. मुंढे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४०९ ,४२०, ४६३, ४६४,४६५,४६८ व अन्वये व कंपनी कायदा कलम ४४७ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी या तकारीत केली आहे. सदर तक्रार पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविली आहे, त्यावर काय कारवाई करायची, या संबंधात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.

सभेअगोदर बोलताना जोशी पुढे म्हणाले, राग सोडा आणि सभेला या. शहराचा विकास हा महत्त्वाचा आहे. आपण दोघे मिळून काम करू ते अधिक योग्य राहील. आमच्याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलिसांकडे द्याव्यात. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र जनतेचे काम आधी करणे हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशी