शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 10:45 IST

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत करण्याची घोषणा होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नागपुरातील ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा रद्द केल्या आहेत. पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निविदा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

आधी हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या अधिवेशनाच्या तयारीवर बैठका होऊ लागल्या होत्या, पण त्याचवेळी अधिवेशन होणार वा नाही, यावरही संभ्रमाची स्थिती होती. अधिवेशनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोविड संक्रमणाची तिसरी लाट तर येणार नाही, यावरही शंका व्यक्त करण्यात येत होती. तर दुसरीकडे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर चर्चा सुरू होती. ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात अधिवेशन मुंबईतच होणार, असेही स्पष्ट केले होते.

या दरम्यान अधिवेशनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडीने जवळपास ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा जारी केल्या होत्या, पण कार्यादेश दिले नव्हते. जर अधिवेशन मुंबईत झाले तर तयारीवर झालेला खर्च वाया जाईल तसेच अधिवेशन नागपुरात होण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच कार्यादेश देण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले होते. सोमवारी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर पीडब्ल्यूडीने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कंत्राटदारांना झटका; अधिकाऱ्यांना दिलासा

निविदा रद्द झाल्याने कंत्राटदारांना मोठा झटका बसला आहे. कंत्राटदारानुसार हिवाळी अधिवेशनाशी एक समांतर अर्थचक्र जुळले आहे. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. छोट्या व्यावसायिकांना फायदा होतो. आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार नसल्यामुळे कंत्राटदार, हॉटेल, रेस्टॉरंट, पेन्डॉल आदींसह अन्य व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

तर, दुसरी अधिकाऱ्यांची वेगवेगळी मते आहेत. काही अधिकारी दिलासा मिळाल्याचे सांगत आहेत. जर प्रत्यक्ष तयारी सुरू झाली असती, तर अनेक कोटी रुपये वाया गेले असते. तर अधिवेशनाशी जुळलेले काही अधिकारी अधिवेशन रद्द झाल्यामुळे दु:खी आहेत. कारण यंदा त्यांची कमाई होणार नाही.

नागपूर अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र

विदर्भवादी नितीन रोंघे यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरातून हिसकविण्याचे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली. यावर्षीचे अधिवेशन कुठल्याही अडचणीविना नागपुरात होऊ शकले असते. पण राज्य सरकारने मुंबईत करण्याचा निर्णय घेऊन नागपूर कराराचे उल्लंघन केले आहे.

मुद्दे -

  • - नागपुरातील हिवाळी अधिवेशन आता मुंबईत
  • - विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीचा निर्णय
  • - निविदा जारी, पण कार्यादेश दिले नव्हते
  • - अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप
  • - काही अधिकाऱ्यांना दिलासा तर काही दु:खी
  • - अधिवेशनाशी संबंधित कंत्राटदारांचे नुकसान
  • - अधिवेशन हे एक समांतर अर्थचक्र
टॅग्स :GovernmentसरकारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन