शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 10:45 IST

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत करण्याची घोषणा होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नागपुरातील ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा रद्द केल्या आहेत. पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निविदा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

आधी हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या अधिवेशनाच्या तयारीवर बैठका होऊ लागल्या होत्या, पण त्याचवेळी अधिवेशन होणार वा नाही, यावरही संभ्रमाची स्थिती होती. अधिवेशनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोविड संक्रमणाची तिसरी लाट तर येणार नाही, यावरही शंका व्यक्त करण्यात येत होती. तर दुसरीकडे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर चर्चा सुरू होती. ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात अधिवेशन मुंबईतच होणार, असेही स्पष्ट केले होते.

या दरम्यान अधिवेशनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडीने जवळपास ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा जारी केल्या होत्या, पण कार्यादेश दिले नव्हते. जर अधिवेशन मुंबईत झाले तर तयारीवर झालेला खर्च वाया जाईल तसेच अधिवेशन नागपुरात होण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच कार्यादेश देण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले होते. सोमवारी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर पीडब्ल्यूडीने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कंत्राटदारांना झटका; अधिकाऱ्यांना दिलासा

निविदा रद्द झाल्याने कंत्राटदारांना मोठा झटका बसला आहे. कंत्राटदारानुसार हिवाळी अधिवेशनाशी एक समांतर अर्थचक्र जुळले आहे. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. छोट्या व्यावसायिकांना फायदा होतो. आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार नसल्यामुळे कंत्राटदार, हॉटेल, रेस्टॉरंट, पेन्डॉल आदींसह अन्य व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

तर, दुसरी अधिकाऱ्यांची वेगवेगळी मते आहेत. काही अधिकारी दिलासा मिळाल्याचे सांगत आहेत. जर प्रत्यक्ष तयारी सुरू झाली असती, तर अनेक कोटी रुपये वाया गेले असते. तर अधिवेशनाशी जुळलेले काही अधिकारी अधिवेशन रद्द झाल्यामुळे दु:खी आहेत. कारण यंदा त्यांची कमाई होणार नाही.

नागपूर अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र

विदर्भवादी नितीन रोंघे यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरातून हिसकविण्याचे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली. यावर्षीचे अधिवेशन कुठल्याही अडचणीविना नागपुरात होऊ शकले असते. पण राज्य सरकारने मुंबईत करण्याचा निर्णय घेऊन नागपूर कराराचे उल्लंघन केले आहे.

मुद्दे -

  • - नागपुरातील हिवाळी अधिवेशन आता मुंबईत
  • - विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीचा निर्णय
  • - निविदा जारी, पण कार्यादेश दिले नव्हते
  • - अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप
  • - काही अधिकाऱ्यांना दिलासा तर काही दु:खी
  • - अधिवेशनाशी संबंधित कंत्राटदारांचे नुकसान
  • - अधिवेशन हे एक समांतर अर्थचक्र
टॅग्स :GovernmentसरकारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन