शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जलयुक्त शिवार अभियानात यंदा ७८४ गावांची निवड

By admin | Updated: May 30, 2017 01:41 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून झालेल्या कामांमुळे भूगर्भातील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली असताना यावर्षी ७८४ गावांची निवड करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त अनुप कुमार : २३ हजार ७५० कामांना सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून झालेल्या कामांमुळे भूगर्भातील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली असताना यावर्षी ७८४ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त अभियानामुळे शिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासोबतच पिकांना संरक्षित सिंचन मिळावे हा उद्देश ठेवून यावर्षी २३ हजार ७५० कामे घेण्यात येणार असून, कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.विभागात मागील वर्षी नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांनी जलयुक्त मोहीमेंतर्गत राज्यात उल्लेखनीय काम केले असल्यामुळे यावर्षी पाण्यासाठी गाव स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने माथा ते पायथा या पद्धतीने तसेच जलसंधारणाच्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून ७८४ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानासाठी ६७० कोटी ४० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ चा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या विविध कार्यक्रमासोबतच नदी खोलीकरणाची कामेसुद्धा याअंतर्गत घेण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यात २२० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३,४१९ कामांसाठी १५० कोटी ८४ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात १३८ कामांसह यशोदा नदी खोलीकरणासाठी सहा कामे घेण्यात आली असून, २,८७० कामांसाठी १४७ कोटी ८९ लक्ष रुपये खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६२ कामांसह २८ जनवन गावांमध्ये ९,७९५ कामे घेण्यात येणार असून, यावर १३५ कोटी ९१ लक्ष रुपये खर्च होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात १११ गावांमध्ये ३,७९१ कामांवर ८७ कोटी ७२ लक्ष रुपये, भंडारा जिल्ह्यात ५६ गावांमध्ये १६८९ कामांसाठी ६० कोटी ५८ लक्ष रुपये तर गोंदिया जिल्ह्यात ६३ गावांमध्ये २,१८६ कामांवर ८७ कोटी ४६ लक्ष रुपये खर्च येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.