शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव कमी

By admin | Updated: March 3, 2015 02:09 IST

गेल्या वर्षी मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहिल्यामुळे पाऊस कमी पडला आणि देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.

नागपूर : शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजपाचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सोमवारी संबंधित निवडणूक याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून ६ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. ५ मेपासून प्रकरणातील मुद्यांवर सुनावणी करण्यात येणार असून तत्पूर्वी याचिकाकर्ता व प्रतिवादींना आवश्यक दस्तावेज न्यायालयात दाखल करायचे आहेत.खुल्या प्रवर्गासाठी राखीव रामटेक मतदारसंघात रेड्डी यांनी प्रथम तर, जयस्वाल यांनी द्वितीय क्रमांकाची मते मिळविली आहेत. जयस्वाल यांनी निवडणुकीपूर्वी रेड्डी यांच्या नामनिर्देशनपत्रावर आक्षेप घेतला होता. मल्लिकार्जुन रेड्डी हे रेड्डी ब्रदर्स अ‍ॅन्ड कंपनीचे भागीदार असून कंपनीने त्यांच्या नावावर मुखत्यारपत्र करून दिले आहे. या आधारावर ते स्वत: निविदा भरतात व पैशांचा व्यवहार करतात. शासकीय कंत्राटदार असल्यामुळे ते निवडणूक लढण्यास अपात्र आहेत असा दावा जयस्वाल यांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी या वादावर निर्णय देताना रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकार केले. यानंतर १५ आॅक्टोबर २०१४ रोजी निवडणूक झाली.जयस्वाल यांनी निवडणूक याचिकेसोबत निवडणुकीनंतरची दोन पत्रे जोडली आहेत. पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंत्यांच्या ३१ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या पत्रानुसार रेड्डी यांचे एक कंत्राट निवडणुकीनंतरही सुरू होते. तसेच, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार २५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत रेड्डी हे शासनाच्या रेकॉर्डमध्ये कंपनीचे भागीदार होते व शासनाची कामे करीत होते. यामुळे राज्यघटनेच्या आर्टिकल १९१ (१)(ई) व लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९(ए) व १०० अनुसार रेड्डी हे निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत असे जयस्वाल यांचे म्हणणे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात यावा, रेड्डी यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्यात यावे व त्यांची निवडणूक रद्द करून द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्या याचिकाकर्त्याला विजयी घोषित करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य १२ उमेदवारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)