शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव कमी

By admin | Updated: March 3, 2015 02:09 IST

गेल्या वर्षी मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहिल्यामुळे पाऊस कमी पडला आणि देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.

नागपूर : शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजपाचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सोमवारी संबंधित निवडणूक याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून ६ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. ५ मेपासून प्रकरणातील मुद्यांवर सुनावणी करण्यात येणार असून तत्पूर्वी याचिकाकर्ता व प्रतिवादींना आवश्यक दस्तावेज न्यायालयात दाखल करायचे आहेत.खुल्या प्रवर्गासाठी राखीव रामटेक मतदारसंघात रेड्डी यांनी प्रथम तर, जयस्वाल यांनी द्वितीय क्रमांकाची मते मिळविली आहेत. जयस्वाल यांनी निवडणुकीपूर्वी रेड्डी यांच्या नामनिर्देशनपत्रावर आक्षेप घेतला होता. मल्लिकार्जुन रेड्डी हे रेड्डी ब्रदर्स अ‍ॅन्ड कंपनीचे भागीदार असून कंपनीने त्यांच्या नावावर मुखत्यारपत्र करून दिले आहे. या आधारावर ते स्वत: निविदा भरतात व पैशांचा व्यवहार करतात. शासकीय कंत्राटदार असल्यामुळे ते निवडणूक लढण्यास अपात्र आहेत असा दावा जयस्वाल यांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी या वादावर निर्णय देताना रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकार केले. यानंतर १५ आॅक्टोबर २०१४ रोजी निवडणूक झाली.जयस्वाल यांनी निवडणूक याचिकेसोबत निवडणुकीनंतरची दोन पत्रे जोडली आहेत. पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंत्यांच्या ३१ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या पत्रानुसार रेड्डी यांचे एक कंत्राट निवडणुकीनंतरही सुरू होते. तसेच, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार २५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत रेड्डी हे शासनाच्या रेकॉर्डमध्ये कंपनीचे भागीदार होते व शासनाची कामे करीत होते. यामुळे राज्यघटनेच्या आर्टिकल १९१ (१)(ई) व लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९(ए) व १०० अनुसार रेड्डी हे निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत असे जयस्वाल यांचे म्हणणे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात यावा, रेड्डी यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्यात यावे व त्यांची निवडणूक रद्द करून द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्या याचिकाकर्त्याला विजयी घोषित करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य १२ उमेदवारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)