शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मूल्यमापनाच्या फटक्यामुळे वर्ष वाया

By admin | Updated: July 13, 2015 02:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित मोहता विज्ञान महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या नियमांचा जोरदार फटका बसला आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित मोहता विज्ञान महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या नियमांचा जोरदार फटका बसला आहे. महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत विद्यापीठाने ‘अनुपस्थित’ दर्शविले. शिवाय नियमांनुसार या गुणांमध्ये बदल करता येणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणे हाच एक उपाय उरला आहे. यासंबंधात नेमकी चूक कुणाची असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.या महाविद्यालयातील विद्यार्थी बीएस्सीच्या गणित विषयाच्या तासांना अनुपस्थित राहिले. त्यामुळे संबंधित प्राध्यापकाने २०१३ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण दिले. परंतु नियमांनुसार अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण गुणपत्रिकेत नोंदवण्याची तरतूद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुपस्थित असल्याचे दाखवण्यात आले. लेखी परीक्षेत जास्त गुण मिळविणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही व त्यामुळे ३३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. महाविद्यालयाने त्यानंतर झालेल्या सेमिस्टर परीक्षेत प्रथम सत्राचेदेखील अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विचारणा केली असता विद्यापीठात गुण पाठविले असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. विद्यापीठ प्रशासनानेदेखील ही बाब गंभीरतेने घेतली नाही व विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच लागेल असे कर्मचारी विद्यार्थ्यांना सांगत गेले. परंतु दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली. त्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे परत पाठविलेले गुण स्वीकारण्यात आले नाही व प्रथम सेमिस्टर परत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना तिसऱ्या सेमिस्टरला प्रवेश नाकारण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. येवले यांच्याशी भेट घेतल्यानंतर नेमका गोंधळ लक्षात आला. अंतर्गत मूल्यांकनाच्या गुणांची फेरनोंद करताच येत नाही असे विद्यापीठाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.(प्रतिनिधी)नेमके जबाबदार कोण?अंतर्गत मूल्यमापनाचे गुण परत पाठवता येत नाही असे महाविद्यालयाला कळविल्याचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट करत संबंधित प्राध्यापकाने शून्य गुण कसे दिले असा प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाची यात काहीच भूमिका नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. परंतु महाविद्यालयाने मात्र विद्यापीठाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने दुसऱ्यांदा गुण पाठवले होते. विद्यापीठाने ते गुण स्वीकार तर केलेच. शिवाय लवकरच निकाल लागेल असे आश्वासनदेखील विद्यार्थ्यांना तत्कालिन कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मग त्यावेळी नियम माहिती नव्हते का अशी विचारणा प्राचार्य डॉ.संजय चरलवार यांनी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या स्थितीला नेमके जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे.