शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

तु. वि. गेडाम हे चक्रधर स्वामींचे खरे अनुयायी

By admin | Updated: July 11, 2017 01:55 IST

चक्रधरस्वामी यांनी धर्मनिरपेक्षतेचा, समतेचा विचार मांडला. त्यांनी सामान्य लोकांना धर्माचे तत्त्वज्ञान समजावे म्हणून संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले.

भाऊ लोखंडे : गेडाम यांचा ९३ वा अभिष्टचिंतन सोहळालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चक्रधरस्वामी यांनी धर्मनिरपेक्षतेचा, समतेचा विचार मांडला. त्यांनी सामान्य लोकांना धर्माचे तत्त्वज्ञान समजावे म्हणून संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी डॉ. तु.वि. गेडाम यांनी महानुभाव साहित्य संमेलनाचा पाया घातला. मराठी साहित्य संमेलन ग्रामीण भागात का होऊ नये, असा सवाल करीत त्यांचे जन्मगाव तळोधी येथे साहित्य संमेलन घेतल्यास सर्व व्यवस्था स्वीकारण्याचा आग्रह त्यांनी धरला. कथित प्रतिष्ठितांना आव्हान देणारे गेडाम हे चक्रधरस्वामींचे खरे अनुयायी होत, असे गौरवपूर्ण मनोगत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केले.महानुभाव सेवा संघ व कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि अ.भा. महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष साहित्य संशोधक व इतिहासतज्ज्ञ डॉ. तु.वि. गेडाम यांच्या ९३ व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ठवरे प्रार्थना सभागृह येथे आयोजित या सोहळ्यात मकरधोकडा महानुभाव पीठाचे प्रमुख आचार्य न्यायंबासबाबा शास्त्री अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी गेडाम यांच्या पत्नी प्रभाताई गेडाम, जिंदा भगत, पुरुषोत्तम ठाकरे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, केशरताई मेश्राम, छत्रपती शेंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा, धनराज रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, डॉ. गेडाम यांनी कल्याण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनी अनेकांचे आयुष्य सुधारले. तळोधीसारख्या ग्रामीण भागापर्यंत शैक्षणिक संस्था पोहोचविली. यासोबतच महानुभाव तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महानुभाव संमेलन व साहित्य संमेलनाचे आयोजन केले. महानुभाव तत्त्वज्ञानासोबतच अस्पृश्यता व अनेक विषयांवर ग्रंथसंपदा निर्माण केली. डॉ. आंबेडकरांसमोर अस्पृश्यतेचा विषय मांडला व त्यांच्या विचारांचे सेवाकार्य पुढे चालविले. शासनाच्या अनेक संस्था, समित्यांमध्ये कार्य केले. इतके मोठे कार्य करूनही त्यांनी कृतज्ञता भाव कायम जोपासला. त्यांच्यातील ही कृतज्ञता त्यांना उच्चस्तरापर्यंत नेत असल्याचे विचार डॉ. लोखंडे यांनी व्यक्त केले. सोहळ्यातील इतर मान्यवरांनी डॉ. गेडाम यांचा ऋषितुल्य कर्मयोगी अशा शब्दात गौरव करीत त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजाचा अमूल्य ठेवा असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष आनंद गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.