शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी

By admin | Updated: May 3, 2016 03:38 IST

प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत

नागपूर : प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत प्रशासकीय बदल्यांना स्थगिती देऊन यावर होणारा खर्च राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात यावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या एका तरुणाने नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविले. श्रीधर आडे (३०) असे या आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव आहे. तो यवतमाळचा रहिवासी आहे. तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आझाद हिंद नावाचे एक क्रीडा मंडळ तो चालवितो. या माध्यमातून तो कबड्डी व अ‍ॅथ्लेटिक्सचे प्रशिक्षण देतो, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही देतो. राज्यात सध्या दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. पाण्यासाठी लोकांचा बळी जात आहे. या परिस्थितीने श्रीधर आडेला व्यथित केले. यावर राज्यातील प्रशासकीय बदल्यांवर अब्जो रुपये खर्च होतात. तेव्हा चालू वर्षात अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि विशेष कारणांमुळे होणाऱ्या बदल्या वगळता इतर सर्व प्रकारच्या गटातील होऊ घातलेल्या बदल्यांना तत्काळ स्थगिती दिली तर बदली प्रक्रियेवर होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी वापरता येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्या तातडीने स्थगित करून त्यावर होणारा खर्च दुष्काळ निवारण्यासाठी कामी आणावा, अशी मागणी करणारे निवेदन श्रीधरने २३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. तसेच १ मेपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास नागपुरात वीरूगिरी आंदोलन करण्याचा इशाराही त्याने दिला होता. शासनाने त्याच्या या निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. १ मेपर्यंत त्याला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्रीधर सोमवारी सकाळीच नागपुरात आला. त्याने वीरूगिरी आंदोलन करण्याचे अगोदरच पक्के केले होते.