शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातूनच यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित

By admin | Updated: November 26, 2014 01:04 IST

प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने

धनराज वंजारी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान नागपूर : प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने समाजमनाला उभारी दिली आणि समाजाला समोर नेले. आपले साहित्य आणि संतपरंपरांचे संचित घेऊनच यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व साकारले. कलांवर प्रेम आणि जगभरातल्या साहित्याच्या वाचनातून त्यांची सामाजिक दृष्टी व्यापक झाली होती. त्यामुळेच त्यांनी रचलेल्या पायावर आज महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे. साहित्यातून यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित झाली, असे मत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे यशवंतरावांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. हा कार्यक्रम बाबूराव धनवटे सभागृहात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे, रमेश बोरकुटे, अजय पाटील, डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. वंजारी म्हणाले, यशवंतरावांना व्यापक सांस्कृतिक दृष्टी होती. त्यामुळेच महाराष्ट्राचे संस्थापक ते आहेत. शिवाजी महाराजांप्रमाणेच यशवंतरावांनीही सामान्य तळागाळातल्या माणसासाठी प्रामाणिक काम केले. त्यामुळेच त्यांना प्रति शिवाजी असेही म्हटले जात होते. आरक्षण देतानाही केवळ कोटा भरणे हा त्यांचा दृष्टिकोन नव्हता तर शोषितांना यानिमित्ताने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कळकळीने काम केले. यासाठीच ते गावकुसाबाहेर असलेल्या तमासगीरांच्या तमाशात जायचे. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून तमाशातील कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ज्या वैचारिक, साहित्यिक, सामाजिक दृष्टीने राजकारण करावे लागते ते आदर्शवत राजकारण यशवंतरावांनी केले. मूल्यांचे अवमूल्यन होत असताना नव्या पिढीला त्यांचे कार्य समजून घेतल्याशिवाय विकास साधता येणार नाही. भाषा, कला, संस्कृती, समाज आणि समाजाचे उन्नयन हा त्यांच्या राजकारणाचा मंत्र होता. असा मुख्यमंत्री पुन्हा लाभणार नाही, असे वंजारी म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, यशवंतरांवामध्ये बालपणापासूनच आत्मविश्वास होता. यशवंतरावांच्या अनुयायांनीच त्यांनी दिलेल्या संस्काराचे पालन केले नाही, त्यामुळे मूल्यांची पडझड राज्यात झाली. आजही त्यांच्या विचारांनीच जाण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. आभार रमेश बोरकुटे यांनी मानले. (प्रतिनिधी)