शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना

By admin | Updated: September 20, 2015 03:11 IST

यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे बुद्धाला समजून घ्यायचे असेल तर अगोदर यशोधरेला समजून घेणे आवश्यक आहे,

नागपूर : यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे बुद्धाला समजून घ्यायचे असेल तर अगोदर यशोधरेला समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे शंकरनगर चौक येथील प्रतिष्ठानच्या सभागृहात डॉ. प्रकाश खरात यांच्या ‘यशोधरा’ या कादंबरीचा प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. मनोहर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे मुख्य वक्ते होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रमेश बोरकुटे व्यासपीठावर होते. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उचलला अशा बहुजन समाजातील नायकांना खलनायक ठरवून त्यांचा आवाज दडपण्याचे काम करण्यात आले. तेव्हा इतिहासातील ज्या-ज्या व्यक्तींवर व्यवस्थेने अन्याय केला, त्यांचा आवाज दडपला अशा लोकांचा आवाज बनून त्यांचे नायकत्व प्रस्थापित करण्याचे काम आंबेडकरी लेखकांनी केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. रुपा कुळकर्णी म्हणाल्या, यशोधरा ही कादंबरी लिहून प्रकाश खरात यांनी केवळ बौद्ध साहित्यालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यमध्ये भर घातली आहे, मराठी साहित्याला मोठी भेट दिली आहे. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी यशोधरा कादंबरी ही बुद्ध काळातील सर्वांगीण परिस्थितीचा कोलाज असल्याचे मत व्यक्त केले. लेखक डॉ. प्रकाश खरात यांनी आपल्या मनोगतात या कादंबरीसाठी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करण्यासोबतच बौद्ध स्थळांना भेटी दिल्याचे सांगितले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी संचालन केले. याप्रसंगी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, ई. झेड. खोब्रागडे, कृष्णा इंगळे, इ.मो. नारनवरे, भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, लोकनाथ यशवंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)