शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

चुकीच्या सरकारी निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:46 IST

Nagpur News Court राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवगार्तून नोकऱ्या मिळविणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना ''जगदीश बहिरा'' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल अवमानना याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअनेकजण अवैधपणे अधिसंख्य पदावर वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवगार्तून नोकऱ्या मिळविणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना ''जगदीश बहिरा'' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल अवमानना याचिकेत करण्यात आला आहे. सरकारी बेजबाबदारपणाचा फटका बसलेले प्राध्यापक नामदेव हेडाऊ यांनी ही याचिका दाखल केली आहे.

६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ''जगदीश बहिरा'' प्रकरणामध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी जीआर जारी करून अनुसूचित जमाती प्रवगार्तून नोकऱ्या मिळविणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले. अशा कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्यानंतर आपोआप समाप्त होणार आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ६ जुलै २०१७ पूर्वी सेवेला संरक्षण मिळालेल्या व जात वैधता प्रमाणपत्राचे दावे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही असे राऊत यांचे म्हणणे आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत राऊत यांच्या सेवेला ६ जुलै २०१७ पूर्वी संरक्षण मिळाले होते. असे असताना त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. सदर याचिकेवर २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. राऊत यांच्यावतीने ?ड. शैलेश नारनवरे कामकाज पाहणार आहे. या प्रकरणाकडे असंख्य पीडित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालय