शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

वकिलांविरुद्ध चुकीची कारवाई, हायकोर्टाने व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.

ठळक मुद्देअवमानना कारवाई रद्द : सत्य माहिती लपविल्याचा होता ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.नागपूर खंडपीठातील एक सदस्यीय न्यायपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे अधिकारी, आरोग्य सेवक व वकील यांनी संगनमताने सत्य माहिती लपवून हवा तो दिलासा मिळवून घेतला, असा ठपका ठेवला होता व या प्रकरणात स्वत:हून अवमानना याचिका दाखल करून घेतली होती. नियमानुसार, ती याचिका न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. या द्विसदस्यीय न्यायपीठाने प्रकरणातील संपूर्ण रेकॉर्ड तपासल्यानंतर कुणीही चुकीचे वागले नसल्याचा निर्णय दिला व अवमानना कारवाई रद्द केली. या कारवाईमुळे विकलांचे झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. तसेच, त्यांच्या त्रासाचीही भरपाई करता येणार नाही. त्यामुळे आम्ही केवळ दिलगिरी व्यक्त करतो असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.या प्रकरणात सर्वजण आपापल्या ठिकाणी बरोबर होते. न्यायाधीश व वकील माणसेच असून प्रत्येक सुनावणीच्या वेळी काय झाले हे आठवेल एवढी प्रभावी स्मरणशक्ती त्यांना मिळालेली नाही. वकिलांनी न्यायालयासोबत बनवाबनवी केली हे रेकॉर्डवरून दिसून येत नाही. तसे असते तर, संबंधित सर्व याचिका एकाच वकिलामार्फत दाखल करण्यात आल्या असत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बदलल्यानंतर जिल्हा परिषदेची भूमिकाही बदलत असते. प्रकरणातील सर्व घोळ त्यामुळेच निर्माण झाला. त्यासाठी वकिलांना दोषी ठरवता येणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ते न्यायालयात वक्तव्ये करीत असतात असे मतही न्यायालयाने निर्णयात नोंदवले.करिअरचा विचार करणे आवश्यकवकिलांच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल अशी गंभीर निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी न्यायालयाने विशेष काळजी घेणे व सावधानी बाळगणे आवश्यक आहे. धोकादायक निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी संबंधित वकिलांना नोटीस द्यायला हवी होती. त्यानंतर, वकिलांनी संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयापुढे आणला असता. तो रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई करण्याची गरज भासली नसती, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, संबंधित न्यायपीठाने वकिलांचे नुकसान व्हावे या उद्देशातून अवमानना कारवाई सुरू केली नाही याचा विश्वास असल्याचेही निर्णयात स्पष्टपणे नमूद केले.

टॅग्स :advocateवकिलHigh Courtउच्च न्यायालय