शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घणाचे घाव घालून पत्नी, मुलगा, सुनेची हत्या

By admin | Updated: May 13, 2014 00:20 IST

कौटुंबिक वादातून संतापलेल्या वृद्धाने सोमवारी पहाटे ५.३0 वाजता घणाचे घाव घालून वृद्ध पत्नी, मुलगा व सुनेला ठार केले. या निर्घृण हत्याकांडाने गावासह परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आरोपी पित्यास अटक : गावात तणावपूर्ण शांतता

गोरेगाव (जि. गोंदिया) : कौटुंबिक वादातून संतापलेल्या वृद्धाने सोमवारी पहाटे ५.३0 वाजता घणाचे घाव घालून वृद्ध पत्नी, मुलगा व सुनेला ठार केले. या निर्घृण हत्याकांडाने गावासह परिसरात एकच खळबळ माजली आहे. रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पित्याने पळ काढला होता. हत्याकांडातील मृतांची नावे बिरनबाई पांडुरंग अगडे (५७), छन्नालाल पांडुरंग अगडे (३७) व योगेश्‍वरी छन्नालाल अगडे (३२, रा. गोरेगाव) अशी आहेत.

आरोपी पांडुरंग अगडे (६२) याला शेतात आलेले गहू विकायचे होते. त्यास पत्नी बिरनबाई व मुलगा छन्नालाल यांचा विरोध होता. त्यावरून चार-पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग पांडुरंग मनात धरून होता. त्यातून त्याने सर्वजण झोपेत असताना सोमवारी पहाटे प्रथम मुलगा छन्नालालवर घणाचे घाव घालून करून जखमी केले. मुलाच्या ओरडण्याने बिरनबाई उठली. तिने सून योगेश्‍वरीच्या मदतीने पांडुरंगला विरोध केला असता रागाने बेभान झालेल्या पांडुरंगने त्यांच्यावरही घणाचे घाव घालून हल्ला चढविला. तो एवढय़ावरच न थांबता त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नी व सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्नही केला.

माय-लेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले असता पांडुरंग घराबाहेर पळाला. घडलेल्या प्रकाराबाबत शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना घरात तिघे जखमी अवस्थेत आढळून आले. घरातील दृष्य भयावह होते. गावकर्‍यांनी जखमींना उपचाराकरिता गोंदिया येथे हलविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, रस्त्यातच बिरनबाईंचा मृत्यू झाला. सून योगेश्‍वरीने उपचारापूर्वीच रूग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. मुलगा छन्नालालची प्रकृती अधिक गंभीर असल्याने नागपूरला पाठविण्यात आले. मात्र नागपूरला जाताना त्यानेही वाटेतच प्राण त्यागला.

या तिहेरी हत्याकांडाची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरली. पांडुरंगविरोधात गावकरी चिडले. गावातले वातावरण भडकू नये, म्हणून पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला मोठय़ा शिताफीने अटक केली. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३0२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रवीन्द्र शिंदे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)