शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
4
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
5
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
6
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
7
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
8
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
9
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
10
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
12
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
13
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
14
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
15
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
16
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
17
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
18
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
19
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
20
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

संमेलनाध्यक्ष होणे आवडेल पण...!

By admin | Updated: September 2, 2015 04:31 IST

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही

नागपूर : साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. साहित्य संमेलन आयोजित क रणारे लोक ते करीत असतात, त्यांनी ते करीत राहावे. शौचालय नसेल तेथे लोक उघड्यावरच विधी आटोपणार ना. पण तरीही मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला संमेलनाध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे. अखेरच्या संमेलनाचे अध्यक्ष व्हायला मला आवडेल, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. पण दहशतवादी म्हणून त्यांनी माझे महत्त्वच वाढविले आहे. महाराष्ट्र भूषणचा विरोध तात्त्विक ४बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यास आपण विरोध केला. तो व्यक्तीविरोध नव्हता. हा विरोध वैचारिक होता. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून ते मुस्लीम विरोधी असल्याचे चित्र निर्माण होते. प्रत्यक्षात महाराजांच्या विश्वासातले आणि मोठ्या पदांवरचे सेनापती, मित्र मुस्लीमच होते. या पुरस्काराने चुकीचा संदेश समाजात जाऊ नये म्हणून विरोध केला. इतिहास चुकीचा सांगितला गेला तर देश धार्मिक आधारावर पुन्हा विभाजनाच्या वाटेवर जाईल. ही काळजी आपण का घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी केला. दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील मलेशप्पा एम. कलबुर्गी यांची हत्या यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरकारची दिवाळखोरीच आहे. हे तालिबान आहे की पाकिस्तान. मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? तत्कालीन गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.