शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्ष होणे आवडेल पण...!

By admin | Updated: September 2, 2015 04:31 IST

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही

नागपूर : साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. साहित्य संमेलन आयोजित क रणारे लोक ते करीत असतात, त्यांनी ते करीत राहावे. शौचालय नसेल तेथे लोक उघड्यावरच विधी आटोपणार ना. पण तरीही मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला संमेलनाध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे. अखेरच्या संमेलनाचे अध्यक्ष व्हायला मला आवडेल, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. पण दहशतवादी म्हणून त्यांनी माझे महत्त्वच वाढविले आहे. महाराष्ट्र भूषणचा विरोध तात्त्विक ४बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यास आपण विरोध केला. तो व्यक्तीविरोध नव्हता. हा विरोध वैचारिक होता. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून ते मुस्लीम विरोधी असल्याचे चित्र निर्माण होते. प्रत्यक्षात महाराजांच्या विश्वासातले आणि मोठ्या पदांवरचे सेनापती, मित्र मुस्लीमच होते. या पुरस्काराने चुकीचा संदेश समाजात जाऊ नये म्हणून विरोध केला. इतिहास चुकीचा सांगितला गेला तर देश धार्मिक आधारावर पुन्हा विभाजनाच्या वाटेवर जाईल. ही काळजी आपण का घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी केला. दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील मलेशप्पा एम. कलबुर्गी यांची हत्या यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरकारची दिवाळखोरीच आहे. हे तालिबान आहे की पाकिस्तान. मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? तत्कालीन गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.