शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राजभवन कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची आराधना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST

नागपूर : शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील ...

नागपूर : शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला. जवळपास ट्रकभर कचरा काढून राजभवन कचरामुक्त केले.

निसर्गाने इतका संपन्न परिसर असूनही असंवेदनशील लाेक त्यात घाण करण्याचे साेडत नाही. राजभवनच्या आसपास असलेल्या स्वीपर माेहल्ला, मुस्लिम लायब्ररी, तीननल चाैक, खाटीकपुरा, बिजलीनगर या भागातील लाेक त्यांच्या घरातील कचरा राजभवनच्या सुरक्षा भिंतीवरून आतमध्ये फेकतात. असा मनभर कचऱ्याचा ढीग राजभवनातील जंगलात पडला हाेता. मनपाच्या अधिकाऱ्यांना वेळाेवेळी तक्रारी केल्या पण त्यांनीही गांभीर्य दाखवले नाही. शेवटी रमेश येवले यांनीच पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी परिसरात फेकलेल्या दारूच्या बाॅटल्स, प्लास्टिक, टायर, पाइप, काचा, घरातील शिळे खाद्यपदार्थ वेचले. असा ट्रकभर कचरा कर्मचाऱ्यांनी जंगलातून काढला आणि राजभवनचे वैभव कायम केले.

जैवविविधतेचा व्हीआयपी परिसर

कधीकाळी राजभवन अतिक्रमणाने बुजला हाेता. दारू पिणारे, जुगार खेळणाऱ्या समाजकंटकांचा अड्डा झाला हाेता. अशावेळी येथे अधिकारी म्हणून आलेले रमेश येवले यांनी राजभवनचा कायापालट केला. हा परिसर केवळ अतिक्रमणमुक्त केला नाही तर या १०० एकराच्या परिसरात लाखाे वृक्षांची लागवड करून जैवविविधता समृद्ध केली. गेल्या २० वर्षात त्यांनी हा परिसर ९० टक्के अतिक्रमणमुक्त केला. परिसरात लहानमाेठे असे ४३ बंधारे बांधले, ८० एकरांमध्ये जैवविविधता उद्यान फुलविले. साेबतच फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, गुलाब उद्यान तयार करून या परिसराचे रूपच पालटले. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक अतिविशिष्ट व्यक्तींना राजभवनची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.

राजभवन हा निसर्गरम्य खजाना आहे. आम्ही हा परिसर ऑक्सिजन झाेन म्हणून विकसित केला असून यातून दरराेज लाखाे लिटर ऑक्सिजन नागपूरकरांना मिळताे. मात्र काही दूषित मानसिकतेचे लाेक या परिसराला दूषित करीत आहेत. लाेकांनी शुद्ध हवेचा, निसर्गाचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आस्वाद घ्यावा. त्याचे साैंदर्य प्रदूषित करू नये.

- रमेश येवले, राजभवन अधिकारी