शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:55 IST

महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात वाघांची संख्या वाढण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या १९० ते २०० असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्यापूर्वी २०१० मध्ये ही संख्या १७० च्या जवळपास होती. परंतु महाराष्ट्रात यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित वन क्षेत्रात झालेल्या वन्यजीव गणनेत वाघांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.वाघांची संख्या वाढण्यामागे वन्यजीव रक्षक त्यासाठी चार मोठी कारणे असल्याचे सांगत आहेत. राज्यात मागील १८ वर्षांतील प्रयत्नानंतर आतापर्यंत टायगर रिझर्व्ह आणि अभयारण्य क्षेत्राच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या ३० पेक्षा अधिक गावांचे वन्यजीवांचे अधिवास असलेल्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले. जवळपास ५,२०० कुटुंबांना वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. यासोबतच वर्ष २०११ पासून आठ वर्षात १२ नवे अभयारण्य घोषित करून संरक्षित वनक्षेत्रांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात जंगल क्षेत्राला लागून तीन हजार हेक्टर अतिरिक्त जमिनीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा वाघांच्या प्रजननासाठी अधिवास वाढला आहे.सरकारनेही शिकारीच्या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन संवेदनशील वन क्षेत्रात चांगल्या वन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटकमागील ४ ते ५ वर्षात महाराष्ट्रात वाघ आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यातील ५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून ते कारागृहात आहेत. वन्यजीव अवयवांच्या विक्रीत सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवरही वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोने नजर ठेवली. त्यामुळे या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले.

शासनाने दाखविली गंभीरता‘काही वर्षांपासून शासन वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर झाले आहे. आधी शिकार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सहज जमानत मिळत होती. त्यामुळे त्यांचे मनसुबे उंचावले होते. परंतु शासनाने त्यांची जमानत थांबविण्यासाठी गंभीर होऊन प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिकारीवर अंकुश लावण्यात यश मिळाले. यामुळे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’-किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :Tigerवाघ