शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:55 IST

महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात वाघांची संख्या वाढण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या १९० ते २०० असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्यापूर्वी २०१० मध्ये ही संख्या १७० च्या जवळपास होती. परंतु महाराष्ट्रात यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित वन क्षेत्रात झालेल्या वन्यजीव गणनेत वाघांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.वाघांची संख्या वाढण्यामागे वन्यजीव रक्षक त्यासाठी चार मोठी कारणे असल्याचे सांगत आहेत. राज्यात मागील १८ वर्षांतील प्रयत्नानंतर आतापर्यंत टायगर रिझर्व्ह आणि अभयारण्य क्षेत्राच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या ३० पेक्षा अधिक गावांचे वन्यजीवांचे अधिवास असलेल्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले. जवळपास ५,२०० कुटुंबांना वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. यासोबतच वर्ष २०११ पासून आठ वर्षात १२ नवे अभयारण्य घोषित करून संरक्षित वनक्षेत्रांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात जंगल क्षेत्राला लागून तीन हजार हेक्टर अतिरिक्त जमिनीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा वाघांच्या प्रजननासाठी अधिवास वाढला आहे.सरकारनेही शिकारीच्या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन संवेदनशील वन क्षेत्रात चांगल्या वन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटकमागील ४ ते ५ वर्षात महाराष्ट्रात वाघ आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यातील ५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून ते कारागृहात आहेत. वन्यजीव अवयवांच्या विक्रीत सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवरही वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोने नजर ठेवली. त्यामुळे या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले.

शासनाने दाखविली गंभीरता‘काही वर्षांपासून शासन वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर झाले आहे. आधी शिकार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सहज जमानत मिळत होती. त्यामुळे त्यांचे मनसुबे उंचावले होते. परंतु शासनाने त्यांची जमानत थांबविण्यासाठी गंभीर होऊन प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिकारीवर अंकुश लावण्यात यश मिळाले. यामुळे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’-किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :Tigerवाघ