शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 7:00 AM

Nagpur News नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे.

ठळक मुद्देशासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद

सुमेध वाघमारे

नागपूर : श्वान, मांजरीने चावा घेतल्याने होणाऱ्या ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. जगात दरवर्षी सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोकांचे मृत्यू एकट्या भारतात होतात. असे असताना, रेबीज या भयंकर रोगाबाबत आजमितीला जनतेत फारशी जागरूकता नाही. धक्कादायक म्हणजे, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे. (World Rabies Day)

रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्रे, मांजर, जंगली कोल्ह्यांपासून ते वटवाघुळाने चावा घेतल्याने होतो. श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे. मात्र, कुठल्याही पशुचिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु, ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरांतील, गावांतील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले, तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १०५२ रेबीजचे प्रकरण

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२१ या दरम्यान सर्वाधिक रेबीजचे प्रकरण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. पाच वर्षांत १०५२ रुग्णांना रेबीज झाला आहे. या शिवाय, भंडारा जिल्ह्यात ३२, चंद्रपूर जिल्ह्यात ९८, गडचिरोली जिल्ह्यात १८७, गोंदिया जिल्ह्यात ५०, तर वर्धा जिल्ह्यात १०४ असे एकूण नागपूर विभागात १५२३ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, रेबीजवर उपचार नसल्याने असे रुग्ण रुग्णालयात आले तरी त्यांना परत पाठविले जाते. यामुळे रेबीज रुग्णांचा मृत्यू घरी झाला असला तरी शासकीय नोंदीत केवळ २ मृत्यू आहे.

-गैरसमजापोटी वाढत आहे रेबीज

‘रेबीज’मुळे मृत्यू अटळ आहे हे माहीत असतानाही अँटिरेबीजची लस गैरसमजापोटी घेतली जात नसल्याचेही समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लस दिलेल्या कुत्र्याच्या दंशानंतर रेबीज होत नाही हा गैरसमज आहे. पाळीव कुत्रे असले तरी लस घ्यायलाच हवी. तीन महिन्यांपर्यंतच्या वयाचा कुत्रा चावल्यानंतर अँटिरेबीजची लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कुत्रा लहान असला तरी रेबीज होणार नाही हा गैरसमज आहे.

- एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू

रेबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. रेबीजचे विषाणू शरीराच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतात. यामुळे मेंदूला सूज येते. एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे महत्त्वाचे असते. भारतात रेबीजचे रुग्ण अद्यापही कमी झालेले नाहीत. रेबीज हा सर्वाधिक मोकाट कुत्र्यांमुळे होत असल्याने कुत्र्यांना लस देणे गरजेचे आहे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदू रोग तज्ज्ञ

टॅग्स :dogकुत्रा