शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

प्रकल्पग्रस्तांच्या निराधार मुलींचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

शरद मिरे भिवापूर : पतीचा अकाली मृत्यू तर कुठे घटस्फोट आदी कारणांमुळे माहेरी परतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुली कित्येक वर्षांसून ...

शरद मिरे

भिवापूर : पतीचा अकाली मृत्यू तर कुठे घटस्फोट आदी कारणांमुळे माहेरी परतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुली कित्येक वर्षांसून आई-वडिलांच्या आश्रयाने बुडीत गावात मुक्कामी आहेत. १२ वर्षापूवी बुडीत गावाचे स्थलांतरण झाले. यात त्यांना हक्काचे छत मिळाले नाही. त्यामुळे या निराधार महिला आपल्या कुटुंबासह पुनर्वसनातील टिनांच्या शेडमध्ये मुक्कामी आहेत. अशातच बुधवारी व्हीआयडीसीने सदर टिनाचे हे शेड काढण्याचे कारस्थान सुरू केले. त्यामुळे या निराधार महिलांचे संसार उघड्यावर आले असून आता राहायचे कुठे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

गोसेखुर्द प्रकल्पात बुडीत ठरलेल्या गाडेघाट व घाटउमरी या गावांचे पुनर्वसन १२ वर्षापूर्वी शहरालगतच्या तास कॉलनी परिसरात करण्यात आले. या पुनर्वसनात ज्या प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून भूखंड मिळाले. त्यांनी आपले घरदार उभे करत संसार थाटला. मात्र ज्यांना भूखंडच मिळाले नाही. अशा प्रकल्पग्रस्तांसाठी व्हीआयडीसीने टिनांचे मोठ शेड उभे करून दिले. एका शेडमध्ये किमान ८ ते १० कुटुंबे मुक्कामी होती. शासनाचे धोरण आणि नशिबी येणारे मरण अशा असह्य जाचाला कंटाळून अनेक प्रकल्पग्रस्तांनी मिळेल त्या रोजीरोटीसाठी आपला टिनाच्या शेडखालील मुक्काम इतरत्र हलविला. मात्र अद्यापही १० प्रकल्पग्रस्त कुटुंबे टिनांच्या शेडमध्येच मुक्कामी आहेत. अशातच बुधवारी सकाळच्या सुमारास व्हीआयडीसी अंतर्गत कंत्राटदाराची माणसे गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात दाखल झाली. त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम असलेले टिनांचे शेड उकलण्यास सुरुवात केली. हे कोणी काढायला सांगितले असा प्रश्न पीडित कुटुंबीयांनी विचारला असता, त्यावर व्हीआयडीसीने पाठविल्याचे संबंधितांनी सांगितले. व्हीआयडीसीच्या या पावित्र्यामुळे बाधित कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. आता राहायचे कुठे, असा प्रश्न शेडमध्ये राहणाऱ्या फुलनबाई कावळे, कुसुम महादेव पासेवार, शांता रामू कामडी, शारदा प्रफुल गजभिये, रुख्मा दिलीप कोहळे, राजू मेश्राम, उषा दादा आरीकर, जनाबाई पाटील आदी महिलांनी केला आहे.

--

यांना भूखंडच मिळाले नाही

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्याप भूखंड मिळालेले नाहीत. त्यात वाढीव कुटुंबांचाही प्रश्न आहेच. मात्र गाडेघाट व घाटउमरी पुनर्वसनातील या १० कुटुंबांची समस्या जरा वेगळी आहे. या कुटुंबांतील महिला प्रकल्पग्रस्तांचे वारसान आहेत. विवाह पश्चात विधवा व घटस्फोट आदी कारणामुळे त्या आई, वडील व भावाच्या आश्रयाला आल्या. एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वर्षापासून त्या येथेच मुक्कामी आहेत. त्यांच्या मुलाबाळांचे लग्न आणि नातवांचा जन्म सुध्दा व्हीआयडीसीने उभारलेल्या टिनांच्या शेडमध्येच झाला आहे. मतदान, रेशनकार्ड, आधारकार्ड सुध्दा पुनर्वसित गावातीलच आहे, मग भूखंड का नाही?

---

मूलबाळ नाही, हा दोष माझा आहे का?

७० वर्षीय फुलनबाई यासुध्दा प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना एकच मुलगा होता. मात्र तीस वर्षापूर्वी त्याचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीचेही निधन झाले. त्यामुळे फुलनबाई एकट्याच टिनाच्या शेडमध्ये राहतात. प्रकल्पग्रस्त असतानासुध्दा त्यांना भूखंड मिळाला नाही. याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भूखंड मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र ‘तुम्हाला मूलबाळ काहीच नसल्याने भूखंड देता येत नाही’ हेच उत्तर अधिकाऱ्याकडून मिळाले. त्यामुळे मूलबाळ नाही, हा माझा दोष आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

----

२५ वर्षांपासून आई-वडिलांकडे राहते

माझ्या आईचे माहेर गाडेघाट घाटउमरी तर सासर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मात्र वडिलांनी सोडल्यामुळे आई आम्हाला घेऊन माहेरी आली. त्यामुळे २५ वर्षापासून आम्ही आधी बुडीत गावात व आता पुनर्वसनातील टिनाच्या शेडमध्ये राहत आहोत. मात्र आम्हाला भूखंड मिळालेला नाही. आता शेड काढत असल्यामुळे राहायचे कुठे, अशा वेदना सुरेश व अरुणा या दाम्पत्याने लोकमतकडे मांडल्या.

--

पुनर्वसनातील टिनाचे शेड काढण्याबाबत ग्रामपंचायतीला कुठलीही कल्पना नाही. अचानक कार्यवाही सुरू झाल्यामुळे येथे मुक्कामी असलेल्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आम्ही व्हीआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. शेड काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. मुक्कामी कुटुंबीयांची अडचण लक्षात घेता, याबाबत संबंधितांशी पत्रव्यवहार करण्यात येईल.

- सुरेश भुरे, ग्रामसेवक, गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसन