शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

प्रकल्पग्रस्तांच्या निराधार मुलींचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

शरद मिरे भिवापूर : पतीचा अकाली मृत्यू तर कुठे घटस्फोट आदी कारणांमुळे माहेरी परतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुली कित्येक वर्षांसून ...

शरद मिरे

भिवापूर : पतीचा अकाली मृत्यू तर कुठे घटस्फोट आदी कारणांमुळे माहेरी परतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुली कित्येक वर्षांसून आई-वडिलांच्या आश्रयाने बुडीत गावात मुक्कामी आहेत. १२ वर्षापूवी बुडीत गावाचे स्थलांतरण झाले. यात त्यांना हक्काचे छत मिळाले नाही. त्यामुळे या निराधार महिला आपल्या कुटुंबासह पुनर्वसनातील टिनांच्या शेडमध्ये मुक्कामी आहेत. अशातच बुधवारी व्हीआयडीसीने सदर टिनाचे हे शेड काढण्याचे कारस्थान सुरू केले. त्यामुळे या निराधार महिलांचे संसार उघड्यावर आले असून आता राहायचे कुठे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

गोसेखुर्द प्रकल्पात बुडीत ठरलेल्या गाडेघाट व घाटउमरी या गावांचे पुनर्वसन १२ वर्षापूर्वी शहरालगतच्या तास कॉलनी परिसरात करण्यात आले. या पुनर्वसनात ज्या प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून भूखंड मिळाले. त्यांनी आपले घरदार उभे करत संसार थाटला. मात्र ज्यांना भूखंडच मिळाले नाही. अशा प्रकल्पग्रस्तांसाठी व्हीआयडीसीने टिनांचे मोठ शेड उभे करून दिले. एका शेडमध्ये किमान ८ ते १० कुटुंबे मुक्कामी होती. शासनाचे धोरण आणि नशिबी येणारे मरण अशा असह्य जाचाला कंटाळून अनेक प्रकल्पग्रस्तांनी मिळेल त्या रोजीरोटीसाठी आपला टिनाच्या शेडखालील मुक्काम इतरत्र हलविला. मात्र अद्यापही १० प्रकल्पग्रस्त कुटुंबे टिनांच्या शेडमध्येच मुक्कामी आहेत. अशातच बुधवारी सकाळच्या सुमारास व्हीआयडीसी अंतर्गत कंत्राटदाराची माणसे गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात दाखल झाली. त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम असलेले टिनांचे शेड उकलण्यास सुरुवात केली. हे कोणी काढायला सांगितले असा प्रश्न पीडित कुटुंबीयांनी विचारला असता, त्यावर व्हीआयडीसीने पाठविल्याचे संबंधितांनी सांगितले. व्हीआयडीसीच्या या पावित्र्यामुळे बाधित कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. आता राहायचे कुठे, असा प्रश्न शेडमध्ये राहणाऱ्या फुलनबाई कावळे, कुसुम महादेव पासेवार, शांता रामू कामडी, शारदा प्रफुल गजभिये, रुख्मा दिलीप कोहळे, राजू मेश्राम, उषा दादा आरीकर, जनाबाई पाटील आदी महिलांनी केला आहे.

--

यांना भूखंडच मिळाले नाही

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्याप भूखंड मिळालेले नाहीत. त्यात वाढीव कुटुंबांचाही प्रश्न आहेच. मात्र गाडेघाट व घाटउमरी पुनर्वसनातील या १० कुटुंबांची समस्या जरा वेगळी आहे. या कुटुंबांतील महिला प्रकल्पग्रस्तांचे वारसान आहेत. विवाह पश्चात विधवा व घटस्फोट आदी कारणामुळे त्या आई, वडील व भावाच्या आश्रयाला आल्या. एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वर्षापासून त्या येथेच मुक्कामी आहेत. त्यांच्या मुलाबाळांचे लग्न आणि नातवांचा जन्म सुध्दा व्हीआयडीसीने उभारलेल्या टिनांच्या शेडमध्येच झाला आहे. मतदान, रेशनकार्ड, आधारकार्ड सुध्दा पुनर्वसित गावातीलच आहे, मग भूखंड का नाही?

---

मूलबाळ नाही, हा दोष माझा आहे का?

७० वर्षीय फुलनबाई यासुध्दा प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना एकच मुलगा होता. मात्र तीस वर्षापूर्वी त्याचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीचेही निधन झाले. त्यामुळे फुलनबाई एकट्याच टिनाच्या शेडमध्ये राहतात. प्रकल्पग्रस्त असतानासुध्दा त्यांना भूखंड मिळाला नाही. याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भूखंड मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र ‘तुम्हाला मूलबाळ काहीच नसल्याने भूखंड देता येत नाही’ हेच उत्तर अधिकाऱ्याकडून मिळाले. त्यामुळे मूलबाळ नाही, हा माझा दोष आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

----

२५ वर्षांपासून आई-वडिलांकडे राहते

माझ्या आईचे माहेर गाडेघाट घाटउमरी तर सासर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मात्र वडिलांनी सोडल्यामुळे आई आम्हाला घेऊन माहेरी आली. त्यामुळे २५ वर्षापासून आम्ही आधी बुडीत गावात व आता पुनर्वसनातील टिनाच्या शेडमध्ये राहत आहोत. मात्र आम्हाला भूखंड मिळालेला नाही. आता शेड काढत असल्यामुळे राहायचे कुठे, अशा वेदना सुरेश व अरुणा या दाम्पत्याने लोकमतकडे मांडल्या.

--

पुनर्वसनातील टिनाचे शेड काढण्याबाबत ग्रामपंचायतीला कुठलीही कल्पना नाही. अचानक कार्यवाही सुरू झाल्यामुळे येथे मुक्कामी असलेल्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आम्ही व्हीआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. शेड काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. मुक्कामी कुटुंबीयांची अडचण लक्षात घेता, याबाबत संबंधितांशी पत्रव्यवहार करण्यात येईल.

- सुरेश भुरे, ग्रामसेवक, गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसन