शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : जैविक खते आता बायो कॅप्सूलच्या रूपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:53 IST

दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संशोधनएक एकरासाठी एक बायो कॅप्सूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोममध्ये असलेल्या कृषी उद्योग विकास मंडळाच्या स्टॉलवर हे बायो कॅप्सूल शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे पिकांना जमिनीद्वारे मिळणारी मूलद्रव्ये मिळत नाही. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधुनिक नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित बायो कॅप्सूल आणले आहे.एका बायो कॅप्सूलमध्ये एक कोटी जीवाणू आहे. ते सर्व प्रकारच्या पिकांसाठी व फळांसाठी उपयुक्त आहे. यामुळे एक एकर शेतात एक बायो कॅप्सूल पुरेसे आहे. या कॅप्सूलमुळे जमिनीची पोत सुधारते, पिकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पादनाचा खर्च कमी होतो. जमिनीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढून पोत सुधारते. बायो कॅप्सूल वापरामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जैविक असल्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. मुळांची वाढ होऊ कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये योग्य प्रमाणात शोषली जातात.सहा कॅप्सूलची एक स्ट्रीप ३५० रुपयाला उपलब्ध आहे. कृषी उद्योग महामंडळाचे रुपेश दिगळे, भागवत सोमवन आणि जयश्री पाटील हे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर