शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

भगवान महावीरांच्या जन्मोत्सवात विश्वशांतीचा संदेश

By admin | Updated: April 10, 2017 02:24 IST

भगवान महावीर स्वामी यांचा २६१६ वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी शहरात आनंदात साजरा झाला.

उपराजधानीत ठिकठिकाणी अभिषेक-पूजा : शोभायात्रेतील नयनरम्य देखाव्यांनी वेधले लक्षनागपूर : भगवान महावीर स्वामी यांचा २६१६ वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी शहरात आनंदात साजरा झाला. यावेळी धर्मध्वजा उंचावून ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान महावीर रथावर स्वार होऊन निघाले. या महोत्सवाने विश्वशांतीचा संदेश दिला. अहिंसेचा मार्ग पत्करून ‘जीयो और जीने दो’चा मूलमंत्र सांगितला. विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच अभिषेक, पूजाअर्चना सुरू झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. संध्याकाळी भक्तीसंध्येत सहभागी होऊन भाविकांनी भगवान महावीर यांचे गुणगान केले. या महोत्सवादरम्यान श्री जैन सेवा मंडळातर्फे सकाळी ७.३० वाजता इतवारीतील श्री दिगंबर जैन शांतिनाथ मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. भव्य रथावर भगवान विराजमान झाले. सोबत विविध देखाव्यांच्या माध्यमातून प्रेम, करुणा, दयेचा संदेश देण्यात आला. या शोभायात्रेत मुनिश्री उपशमसागरजी गुरुदेव रथावर स्वार होते. लेझिम पथकानेही लक्ष वेधले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जिनेंद्र जैन लाला, मंत्री सतेंद्र जैन मामू यांच्या मार्गदर्शनात ही शोभायात्रा इतवारी, महाल, टिळक पुतळा होत ९.३० वाजता चिटणीस पार्क येथे पोहोचली. येथे भगवान महावीरांचा अभिषेक आणि पूजन करण्यात आले. चंद्रकांतजी वेखंडे आणि पंकज बारिया यांनी दीपप्रज्वलन तर अनिलकुमार जैन यांनी ध्वजारोहण केले. परवारपुरा महिला मंडळ आणि आदर्श महिला मंडळाने ध्वजगीत सादर केले. लाडपुरा महिला मंडळाद्वारे मंगलाचरण सादर करण्यात आले.(प्रतिनिधी) यांची होती उपस्थितीयावेळी मंचावर भारतवर्षीय दिगंबर तीर्थरक्षा कमिटीच्या अध्यक्ष सरिता जैन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून अनिलकुमार जैन, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. राजू शेट्टी, खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आ. विकास कुंभारे, कृष्णा खोपड़े, जिनेंद्र लालाजी, सुभाष कोेटेचा, राष्ट्रीय महामंत्री, तीर्थरक्षा कमिटी संतोष पेंढारी, प्रा. डी. ए. पाटील, सतीश जैन कोयलावाले, संजय महाजन, प्रकाश मारवड़कर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत जैन सेवा मंडळचे अध्यक्ष सतीश पेंढारी जैन, मंत्री पीयूष शाह, उपाध्यक्ष डॉ. कमल पुगलिया, शरद मचाले, कोषाध्यक्ष विजय उदापूरकर, उपमंत्री संजय टक्कामोरे, रवींद्र वोरा, मनोज बंड, पंकज बोहरा, संजय नेताजी, रिंकू जैन, महिला अध्यक्ष कश्मिरा पटवा, शीला उदापूरकर यांनी केले.भक्तीच्या रंगात साधूंचा सहवासया कार्यक्रमात प.पू. वज्ररत्न म.सा. हे आपल्या संदेशात म्हणाले, भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवात भक्तीचा रंग आणि साधूंचा सहवास लाभला आहे. कर्माशी लढताना एकता आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, नागपुरात जैन सेवा मंडळद्वारे कॉलेज व्हायला हवे. यावेळी त्यांना खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत समाजातर्फे प्रखर प्रवचनकाराची पदवीही प्रदान करण्यात आली. याप्रसंगी खा. अजय संचेती म्हणाले, विश्वासाच्या भावनेने समाजाची सेवा करायला हवी. खा. शेट्टी म्हणाले, कर्नाटक सरकारने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात जसे योगदान दिले तसेच योगदान महाराष्ट्र आणि भारत सरकारनेही द्यावे, यासाठी मी पुढाकार घेईल. अध्यक्षीय भाषण करताना सरिता जैन म्हणाल्या, नागपुरी संत्र्यांमध्ये जसा गोडवा आहे तसाच गोडवा तीर्थरक्षा कमिटीत आहे. पार्श्वनाथ मंदिर, पारडीयेथे मंदिरातून प्रभातफेरी काढण्यात आली. स्वरूप संकुलात साध्वी सुरेखा यांचे प्रवचन झाले. पंचकल्याणक पूजा पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरूपचंद लुणावत, सुरेश लुणावत, नीलेश मेहता, विजय सिंघी, महेंद्र रामानी यांनी सहकार्य केले. महावीर वूमन्स क्लबयेथे आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष वैशाली नखाते, दीपाली भुसारी, सरिता सावलकर, पूजा मानेकर, मंजू बिबे, मंगला सावलकर, अर्चना शाहाकार, मनीषा रोहणे, राणी जैन, दीप्ती गिल्लूरकर, शुभांगी पांडवकर, स्वाती पळसापुरे, सोनाली सवाने, उज्ज्वला बेलसरे यांनी सहकार्य केले.