शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक श्रवण दिन; नात्यात लग्न केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला कर्णबधिरतेचा धोका

By सुमेध वाघमार | Updated: March 3, 2023 08:00 IST

Nagpur News मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे१४० मधून ६२ बालके कर्णबधिरमेयोतील इएनटी विभागाचा सर्वेक्षणातील निष्कर्ष

सुमेध वाघमारे

नागपूर : नात्यात लग्न केल्याने जन्माला येणारे मूल अपंग होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंख्येला लागलेला अभिशाप आहे. नात्यात रक्त केल्याने रक्तगट एक होऊन त्यात एकसूत्रता येते, रक्ताचा गट एक झाल्यामुळे जन्माला येणारे मूल कर्णबधिर किंवा मतिमंद किंवा अंध किंवा अस्थिव्यंग किंवा बहुविकलांग असू शकते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कान, नाक व घसारोग विभागाने (इएनटी) १ महिन्यापासून ते ५ वर्षे वयोगटातील १४० कर्णबधिर बालकांचे सर्वेक्षण केले. त्यात नात्यात लग्न झालेल्या ६२ जोडप्यांच्या पोटी कर्णबधिर मुले जन्माला आली.

-अनुवांशिकतेमुळे ६ मुले कर्णबधिर

इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी सांगितले, आई किंवा वडील कर्णबधिर असतील तर मुलेही कर्णबधिर होण्याची शक्यता असते. विभागाने केलेल्या १४० कर्णबधिर मुलांच्या सर्वेक्षणात अनुवांशिकतेमुळे ६ मुले कर्णबधिर असल्याचे आढळून आले.

-कर्णबधिरतेमध्ये कमी वजनाची ३६ टक्के बालके

गुंतागुंतीची प्रसूती (हायरिस्क माता), जन्मोत्तर तीव्र कावीळ अथवा जन्मजात इतर कुठलेही व्यंग असलेल्या बालकांना जन्मजात श्रवणदोष होण्याची शक्यता असते. या सर्वेक्षणात कर्णबधिर असलेल्या मुलांमध्ये ३६ टक्के कमी वजनाची तर १७ टक्के बालके मुदतपूर्व प्रसूतीची होती.

-७० कोटी लोक होऊ शकतात कर्णबधिर

मेयोच्या इएनटी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांनी सांगितले, तरुणांमध्ये वाढत्या हेडफोनमुळे कर्णबधिरता येण्याची शक्यता वाढली आहे. हेडफोनमुळे येत्या काळात जवळपास २५० कोटी लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यातील जवळपास ७० कोटी लोक कर्णबधिर होऊन त्यांना कर्णयंत्राची मदत घेण्याची वेळ येईल.

-जन्मानंतर श्रवण चाचणी आवश्यक

जन्मजात बहिरेपण सहज लक्षात येणारा प्रकार नाही. जो काय दोष असतो तो अंत:करण असतो. तो दिसून येत नाही. शिवाय काही दुखत नसल्याने आणि मूल काही बोलू शकत नसल्याने बहिरेपणा ओळखता येत नाही. यामुळे जन्मानंतर प्रत्येक बाळाची श्रवण चाचणी आवश्यक आहे. वेळेत आजाराचे निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो.

-डॉ. जीवन वेदी, प्रमुख इएनटी विभाग, मेयो

टॅग्स :Healthआरोग्य