शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 10:37 IST

आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैलीने स्मृतिभ्रंश दूर ठेवता येऊ शकतो. या आजारावर औषध नसले तरी, काही औषधांनी लक्षणे कमी करता येऊ शकतात, अशी माहिती, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्मृतिभ्रंश दिवसाच्या पूर्वसंध्येला दिली.लोकमतशी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, ‘अल्झायमर’ रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहिशी होते. हा आजार वयाच्या ३० व्या वर्षी देखील होऊ शकतो. पण, ६० वर्षांनंतर या आजाराचे निदान होतं. तसंच वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याचा धोका वाढतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात, साडे चार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८० च्या पुढे जात असून या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५ टक्के लोकांना कमी वयात हा आजार होऊ शकतो.स्मृतिभ्रंश हा वाढत्या वयानुसार वाढत जातो. पण, भारतात आजही ५० टक्क्याहून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. ‘अल्झायमर’ रोगाचे सुरुवातीला निदान करणे कठीण असते. वाढत्या वयामुळे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. पण, वार्धक्य आणि आनुवंशिकता यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते.

हळूहळू आजाराची तीव्रता वाढतेआजारामध्ये स्मरणशक्ती हळूहळू कमी होते, तर्कसंगत विचार करण्याची शक्ती-क्षमता कमी होते, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो व कालांतराने दैनदिन काम करणेही कठीण होते. हळूहळू आजाराची तीव्रता वाढत जाते.

चाळिशीनंतर विशेष लक्ष द्याचाळिशीपासूनच योग्य जीवनशैली अंगिकारणे जास्त महत्वाचे आहे. अशांनी वेळच्या वेळी जेवण, झोप व व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामध्ये दमश्वासाचे व्यायाम, स्नायूंना बळकटी देणारे, लवचिकता आणणारे व व्यक्तीची चिकाटी वाढवणारे शारीरिक व्यायाम गरजेचे आहे.

असा ठेवा आहारया आजारात आहाराचे फार महत्त्व आहे. मेंदू हा चरबीने बनलेला असतो. यामुळे चांगले चरबीयुक्त आहार घेणे आवश्यक असते. जेवणात सोयाबीन तेल, वनस्पती तेल, सुर्यमुखी तेलाचा वापर करू नये. या ऐवजी नारळ तेल, बटर, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑईल तेलाचा वापर करावा. साखर आणि साखरेचे पदार्थ टाळावे. सुक्या मेवाचा आहारात समावेश करावा. जास्तीत जास्त भाज्या खाव्यात. भात आणि पोळी जेवढी कमी खाता येईल तेवढे चांगले.अंडी न खाणाऱ्यांनी जीवनसत्व बी १२ वरून घ्यावे.

टॅग्स :Healthआरोग्य