शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 10:37 IST

आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैलीने स्मृतिभ्रंश दूर ठेवता येऊ शकतो. या आजारावर औषध नसले तरी, काही औषधांनी लक्षणे कमी करता येऊ शकतात, अशी माहिती, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्मृतिभ्रंश दिवसाच्या पूर्वसंध्येला दिली.लोकमतशी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, ‘अल्झायमर’ रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहिशी होते. हा आजार वयाच्या ३० व्या वर्षी देखील होऊ शकतो. पण, ६० वर्षांनंतर या आजाराचे निदान होतं. तसंच वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याचा धोका वाढतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात, साडे चार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८० च्या पुढे जात असून या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५ टक्के लोकांना कमी वयात हा आजार होऊ शकतो.स्मृतिभ्रंश हा वाढत्या वयानुसार वाढत जातो. पण, भारतात आजही ५० टक्क्याहून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. ‘अल्झायमर’ रोगाचे सुरुवातीला निदान करणे कठीण असते. वाढत्या वयामुळे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. पण, वार्धक्य आणि आनुवंशिकता यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते.

हळूहळू आजाराची तीव्रता वाढतेआजारामध्ये स्मरणशक्ती हळूहळू कमी होते, तर्कसंगत विचार करण्याची शक्ती-क्षमता कमी होते, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो व कालांतराने दैनदिन काम करणेही कठीण होते. हळूहळू आजाराची तीव्रता वाढत जाते.

चाळिशीनंतर विशेष लक्ष द्याचाळिशीपासूनच योग्य जीवनशैली अंगिकारणे जास्त महत्वाचे आहे. अशांनी वेळच्या वेळी जेवण, झोप व व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामध्ये दमश्वासाचे व्यायाम, स्नायूंना बळकटी देणारे, लवचिकता आणणारे व व्यक्तीची चिकाटी वाढवणारे शारीरिक व्यायाम गरजेचे आहे.

असा ठेवा आहारया आजारात आहाराचे फार महत्त्व आहे. मेंदू हा चरबीने बनलेला असतो. यामुळे चांगले चरबीयुक्त आहार घेणे आवश्यक असते. जेवणात सोयाबीन तेल, वनस्पती तेल, सुर्यमुखी तेलाचा वापर करू नये. या ऐवजी नारळ तेल, बटर, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑईल तेलाचा वापर करावा. साखर आणि साखरेचे पदार्थ टाळावे. सुक्या मेवाचा आहारात समावेश करावा. जास्तीत जास्त भाज्या खाव्यात. भात आणि पोळी जेवढी कमी खाता येईल तेवढे चांगले.अंडी न खाणाऱ्यांनी जीवनसत्व बी १२ वरून घ्यावे.

टॅग्स :Healthआरोग्य