शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

देशाच्या विकासासाठी एकत्रित काम करावे

By admin | Updated: January 25, 2017 02:49 IST

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन

जगदीश रामास्वामी : वायसीसीईतर्फे ‘इंडिया अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन नागपूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि.चे अध्यक्ष (कॉर्पोरेट बिझनेस एक्सेलन्स) जगदीश रामास्वामी यांनी येथे केले. मेघे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या (एमजीआय) वायसीसीई यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या(वायसीसीई)वतीने एक दिवसीय ‘इंडस्ट्री अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह-२०१७’चे आयोजन २१ जानेवारीला कॉलेजमध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एनवायएसएसचे सचिव सागर मेघे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप भट्ट, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या ग्लोबल वर्कफोर्स मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विप्रो टेक्नॉलॉजिसचे नॅशनल कॅम्पस मॅनेजर विश्वनाथन वेणकता सुब्रमणियम, ब्रेन अ‍ॅण्ड कंपनीचे भागीदार हर्षवर्धन, इन्क्युबेशन सेंटर आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. मिलिंद अत्रे, वेबोनाईस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा.लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष (एचआर अ‍ॅण्ड कल्चर) सच्चिदानंद कुळकर्णी, सीटीओ, केपीआयटी टेक्नॉलॉजीसचे सीटीओ वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. हेमंत पांडे आणि आयबीएम-इंडियाचे डिलेव्हरी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह डॉ. अ‍ॅन्जेला कुरियन उपस्थित होते. रामास्वामी म्हणाले, शासन, नागरिक, शिक्षण, उद्योग, सामाजिक स्वातंत्र्य देशाच्या विकासाचे पाच स्तंभ आहेत. या स्तंभांनी एकत्रित काम केल्यास देशाचा विकास होईल. परिषदेने उद्योग आणि शैक्षणिक समूहातील दरी दूर होईल. सागर मेघे म्हणाले, विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा आणि उद्योगांना तयार राहावे, यासाठी एमजीआयने पुढाकार घेतला आहे. वायसीसीईचे प्राचार्य आणि कॉन्क्लेव्हचे चेअरमन डॉ. यू.पी. वाघे यांनी वायसीसीईच्या १९८४ या स्थापना वर्षांपासूनची उपलब्धी सांगितली. एमजीआय प्लेसमेंटचे संचालक आणि कॉन्क्लेव्हचे सचिव प्रा. जावेद शेख यांनी आयोजनाची उद्दिष्टे सांगितली. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सत्रात जगदीश रामास्वामी, दिलीप भट्ट, डॉ. मिलिंद अत्रे, डॉ. के.एम. सुकीन्द्रन, हर्षवर्धन या वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ‘भारताच्या संक्रमण अर्थव्यवस्थेत युवकांना प्रशिक्षण’ या विषयावर डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विश्वनाथ वेणकता सुब्रमणियम, सच्चिदानंद कुळकर्णी, डॉ. हेमंत पांडे, डॉ. अ‍ॅन्जेला कुरियन यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. प्रा. जावेद शेख आणि डॉ. वैशाली रहाटे यांनी दोन्ही चर्चासत्राचे संचालन केले. डीबीएसीईआरचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. तत्त्ववादी, आरजीसीईआरचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. बापट, डीएमआयईटीआरचे प्राचार्य डॉ. एस.पी. उंटवाले, डीएमआयएमएसचे संचालक डॉ. शायनी चीब, एमजीआयचे संचालक (प्रशिक्षण) शांतनू खंडेश्वर, वायसीसीईचे रजिस्ट्रार डॉ. पी.के. डाखोळे आणि वायसीसीईच्या अकॅडमिक मॅटरचे डीन डॉ. एस.डी. भोळे उपस्थित होते.(वा.प्र.)