शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

रेल्वे ओव्हरब्रिजचे काम ठरले डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरालगतच्या कळमेश्वर-काटाेल मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला ...

आशिष साैदागर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरालगतच्या कळमेश्वर-काटाेल मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या अतिशय संथ वेगामुळे हा रेल्वे ओव्हरब्रिज दीड वर्षानंतरही पूर्णत्वास गेला नाही. या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असून, येथे खाेल खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी व चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा असल्याने हा रेल्वे फ्लायओव्हर सध्यातरी डाेकेदुखी ठरत आहे.

नागपूर-काटाेल-वरुड-माेर्शी-अमरावती हा राज्यमार्ग कळमेश्वर शहरातून गेला आहे. हा मार्ग चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वेमार्गाला छेदून गेल्याने कळमेश्वर शहरालगत या मार्गावर दाेन तर कळमेश्वर-गाेंडखैरी मार्गावर एक, असे तीन रेल्वे फाटक आहेत. या रेल्वेेमार्गावर प्रवासी व मालगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने हे तिन्ही रेल्वे फाटक दर १५ मिनिटाला बंद हाेतात. नागपूर-अमरावती व कळमेश्वर-गाेंडखैरी हे दाेन्ही मार्ग वर्दळीचे असल्याने, या तिन्ही फाटकाजवळ वाहतूक काेंडी हाेते.

ही वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील दाेन्ही रेल्वे फाटकाजवळ महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमि.(महारेल)ने रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. यात कळमेश्वर-नागपूर मार्गावरील फाटकाजवळचा राेड थाेडा शाबूत आहे. मात्र, कळमेश्वर-काटाेल मार्गावरील फाटकाजवळील राेड खड्डे, डबके व चिखलात गडप झाला आहे. हे खड्डे बुजवून १५० मीटरचे डांबरीकरण करण्याचे औदार्यही प्रशासन दाखवायला तयार नाही.

...

आठ महिन्यापूर्वीच मुदत संपली

महारेलने या कामाचे कंत्राट एमबीपीसी-केईसी नामक कंपनीला दिले आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजची किंमत २४ काेटी ५२ लाख १० हजार ६३२ रुपये ठरविण्यात आली. कंत्राटदाराने या कामाला ६ डिसेंबर २०१९ पासून सुरुवात केली. या रेल्वे ओव्हरब्रिजचे पूर्ण काम ३६० दिवसामध्ये पूर्ण करणे अपेक्षित हाेते. मात्र, ही मुदत संपून आठ महिने अधिक झाले. मात्र, या काळात रेल्वे ओव्हरब्रिजचे केवळ ४० टक्के काम करण्यात आले.

...

१५० मीटरचा जीवघेणा प्रवास

या रेल्वे ओव्हरब्रिजची लांबी ५३८.४९ मीटर आहे. या फाटकाजवळ १५० मीटरच्या राेडवर अगणित खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहनांच्या चाकांमुळे आलेल्या मातीचा माेठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. येथून मार्गक्रमण करताना डबक्यांमुळे खड्ड्यांच्या खाेली व रुंदीचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. वाहनांच्या चाकांमुळे चिखल उडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागताे. दुचाकीचालकांसाठी हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.