शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

रेल्वे ओव्हरब्रिजचे काम ठरले डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरालगतच्या कळमेश्वर-काटाेल मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला ...

आशिष साैदागर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरालगतच्या कळमेश्वर-काटाेल मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या अतिशय संथ वेगामुळे हा रेल्वे ओव्हरब्रिज दीड वर्षानंतरही पूर्णत्वास गेला नाही. या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असून, येथे खाेल खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी व चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा असल्याने हा रेल्वे फ्लायओव्हर सध्यातरी डाेकेदुखी ठरत आहे.

नागपूर-काटाेल-वरुड-माेर्शी-अमरावती हा राज्यमार्ग कळमेश्वर शहरातून गेला आहे. हा मार्ग चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वेमार्गाला छेदून गेल्याने कळमेश्वर शहरालगत या मार्गावर दाेन तर कळमेश्वर-गाेंडखैरी मार्गावर एक, असे तीन रेल्वे फाटक आहेत. या रेल्वेेमार्गावर प्रवासी व मालगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने हे तिन्ही रेल्वे फाटक दर १५ मिनिटाला बंद हाेतात. नागपूर-अमरावती व कळमेश्वर-गाेंडखैरी हे दाेन्ही मार्ग वर्दळीचे असल्याने, या तिन्ही फाटकाजवळ वाहतूक काेंडी हाेते.

ही वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील दाेन्ही रेल्वे फाटकाजवळ महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमि.(महारेल)ने रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. यात कळमेश्वर-नागपूर मार्गावरील फाटकाजवळचा राेड थाेडा शाबूत आहे. मात्र, कळमेश्वर-काटाेल मार्गावरील फाटकाजवळील राेड खड्डे, डबके व चिखलात गडप झाला आहे. हे खड्डे बुजवून १५० मीटरचे डांबरीकरण करण्याचे औदार्यही प्रशासन दाखवायला तयार नाही.

...

आठ महिन्यापूर्वीच मुदत संपली

महारेलने या कामाचे कंत्राट एमबीपीसी-केईसी नामक कंपनीला दिले आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजची किंमत २४ काेटी ५२ लाख १० हजार ६३२ रुपये ठरविण्यात आली. कंत्राटदाराने या कामाला ६ डिसेंबर २०१९ पासून सुरुवात केली. या रेल्वे ओव्हरब्रिजचे पूर्ण काम ३६० दिवसामध्ये पूर्ण करणे अपेक्षित हाेते. मात्र, ही मुदत संपून आठ महिने अधिक झाले. मात्र, या काळात रेल्वे ओव्हरब्रिजचे केवळ ४० टक्के काम करण्यात आले.

...

१५० मीटरचा जीवघेणा प्रवास

या रेल्वे ओव्हरब्रिजची लांबी ५३८.४९ मीटर आहे. या फाटकाजवळ १५० मीटरच्या राेडवर अगणित खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहनांच्या चाकांमुळे आलेल्या मातीचा माेठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. येथून मार्गक्रमण करताना डबक्यांमुळे खड्ड्यांच्या खाेली व रुंदीचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. वाहनांच्या चाकांमुळे चिखल उडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागताे. दुचाकीचालकांसाठी हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.