शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘रेल्वे ओव्हरब्रिज’चे काम ठरले डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खात/रेवराल : रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी खात (ता. माैदा) येथे रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात/रेवराल : रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी खात (ता. माैदा) येथे रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ते काम नियाेजित काळात पूर्ण करण्यात आले नाही. शिवाय, या कामासाठी तयार करण्यात आलेल्या वळण मार्गावरील चिखलामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे. यात कंत्राटदार कंपनी मनमानी कारभार करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, हे काम डाेकेदुखी ठरत असल्याचे सांगितले.

खात जवळील रेल्वे फाटक मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून, येथे रामटेक-खात-भंडारा मार्ग रेल्वे मार्गाला छेदून गेला आहे. पुढे हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. रेल्वेफाटकाजवळील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी रेल्वे प्रशासन व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ‘रेल्वे ओव्हरब्रिज’ मंजूर करून त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे या कामाचे कंत्राट बंका कन्स्ट्रक्शन कंपनीला देत कंपनीने कामाला सुरुवातही केली.

उपाययाेजनांच्या अभावामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यास ते असभ्य वक्तव्य करीत असल्याचा आराेपही नागरिकांनी केला आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुमार दर्जाचे आहे, असा आराेप काही जाणकार व्यक्तींनी केला असून, यात अधिकारी व कंत्राटदार कंपनी यांचे संगनमत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लाेकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्या गुणवत्तेची निरपेक्ष चाैकशी करून त्यात सुधारणा न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा परिसरातील गावांमधील नागरिकांनी दिला आहे.

....

अपघातांचे प्रमाण वाढले

या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज जवळ वळण मार्ग तयार करण्यात आला. त्या वळण मार्गाचे डांबरीकरण केले नसून, त्यावर केवळ मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आला आहे. पावसाळा सुरू हाेताच त्या मातीचा चिखल तयार झाला आहे. शिवाय, त्यावर खड्डेही तयार झाले आहेत. या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत तर चारचाकी वाहनांमुळे चिखल व डबक्यांमधील गढूळ पाणी अंगावर उडत असल्याने व कपडे खराब हाेत असल्याने नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे.

...

उपाययाेजनांचा अभाव

या ठिकाणी वळण मार्गावर कंत्राटदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नाहीत. या ठिकाणी साधे दिशादर्शक फलकही लावण्यात आले नाही. त्यामुळे नवीन वाहनचालकांची माेठी गैरसाेय हाेत असून, ती गैरसाेय अपघातास कारणीभूत ठरत आहे. चारचाकी वाहन राेडलगतच्या नालीत शिरल्याने वाहनातील चाैघे जखमी झाल्याची घटना येथे नुकतीच घडली आहे. काही दिवसांपूर्वी एक चारचाकी वाहन चक्क राेडलगतच्या दुकानात शिरले हाेते.

...

या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला वेग द्यावा. वळण मार्ग चिखलमय असल्याने नागरिकांना त्रास हाेताे. त्यामुळे यात सुधारणा करावी. या कंपनीचे अधिकारी लाेकप्रतिनिधी व नागरिकांशी उर्मटपणे बाेलत असल्याने त्यांनी मनमानी थांबावावी व त्यांना साैजन्याने वागण्याची समज द्यावी.

- ज्योती डहाके,

सरपंच, खात.

...

या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बाजूचा रस्ता तयार करणार नाही. या संदर्भात नागरिक कुणाकडेही तक्रार करू शकतात. याबाबत नागरिकांनी आपल्याला न सांगता सरकाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सांगावे.

- विकासकुमार वंतस,

साईड इंजिनिअर.