शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

काम कवडीचे नाही, दमडीही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणुका आल्या की विकासाच्या घोषणा होतात. निवडणूक संपली की, पदाधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : निवडणुका आल्या की विकासाच्या घोषणा होतात. निवडणूक संपली की, पदाधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर पडतो. मनपातील सत्ताधारी असाच चौफेर शहर विकासाचा दावा करीत आहेत. प्रत्यक्षात काही मोजके प्रकल्प वगळता या घोषणाच ठरल्या आहेत. उपराजधानीचे कधीकाळी वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची मागील दशकापासून घोषणा सुरू आहेत. ११८ कोटींचा प्रकल्प आज २११७.७१ कोटींवर पोहचला. मात्र अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काम कवडीचे नाही अन् दमडीही खर्च नाही, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सर्वप्रथम २५ नोव्हेंबर २००८ मध्ये, त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१० मध्ये नागनदी पुनजीर्वित व प्रदूषणमुक्त करण्याचा प्रस्ताव आला. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात नाग नदी प्रकल्पासाठी ११८ कोटींचा निधी खर्च करण्याची घोषणा केली होती. परंतु आजवर हा निधी खर्चच झाला नाही. त्यानंतर तीन वर्षांनी १८ मार्च २०१६ रोजी केंद्र सरकारकडून १ हजार २५२.३३ कोटींच्या निधीस तत्त्वत: मंजुरी मिळाली. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन कंपनी (जिका) कंपनीने सर्वेक्षणाला सुरुवातही केली होती. परंतु कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढून २११७.७१ कोटींवर गेला आहे. म्हणजेच २०१६ च्या तुलनेत प्रकल्पाचा खर्च ८६५.३८ कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पात शहरातील तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसोबतच स्टॉर्म ड्रेनलाइन व मलजलवाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार व नागपूर महापालिका यांचा ६०:२५:१५ या प्रमाणात आर्थिक वाटा राहणार आहे. त्यानुसार मनपाला आठ वर्षांत २९६.८२ कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. केंद्र सरकारला जायकाकडून ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी १ हजार ८२० कोटी रुपये कर्ज मिळणार आहे.

नदीत सिवरेज सोडणे कधी थांबणार?

२०११ मध्ये शहराला ५२० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. यातून निर्माण होणाऱ्या ३४५ एमएलडी सांडपाण्यापैकी ८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात होती. उर्वरित २६५ एमएलडी सांडपाणी नदीत सोडले जात होते. आज शहराला जवळपास ७०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. यातून ५५० एलएलडी सिवरेज निर्माण होते. पैकी ३०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित २५० सिवरेज नदीत सोडले जाते. म्हणजेच दहा वर्षांपूर्वी व आज नदीत सोडण्यात येणाऱ्या सिवरेजमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

....

असे आहे निधी नियोजन

- केंद्र सरकार : १,३२३ कोटी (६० टक्के)

- राज्य सरकार : ४९७ कोटी (२५ टक्के)

- महापालिका : २९६ कोटी (१५ टक्के)

....

भाग- १