शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नागपूर जिल्ह्यातल्या खापरी ‘आरओबी’चे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:28 IST

वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनऊ महिने संपले६० कोटींचा होणार खर्च, का रखडले काम?

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. हा पूल वर्षभरात पूर्ण होणार होता. पण नऊ महिने उलटूनही काहीच झाले नाही. आता कुठे कामाचा श्रीगणेशा होताना दिसत आहे.प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली असता, या प्रकल्पाचे बरेच काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी(एनएचएआय) हे काम मुदतीत पूर्ण होईल, असा दावा करीत आहेत.वर्धा मार्गावर जुना दोन लेनचा खापरी पूल अतिशय अरुंद आहे. या पुलावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेहमीच अपघात होतात. या समस्येचा निपटारा करण्यासाठी ‘एनएचएआय’च्या वतीने जुन्या खापरी पुलाला लागून नवा दोन लेनचा खापरी आरओबी तयार करण्यात येत आहे. १.१२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचा खर्च ६० कोटी रुपये आहे. या पुलाचे भूमिपूजन २५ जून २०१७ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.यावेळी गडकरींनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना हा पूल १२ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यातील नऊ महिन्यांचा कालावधी संपला आहे. परंतु आताही बहुतांश काम अपूर्ण असल्याचे दिसत आहे. पुलाचे ३२ पैकी २६ पिल्लर तयार झाले आहेत. सहा पिल्लरचे काम झालेले नाही. हे पिल्लर रेल्वेच्या परिसरात तयार करावयाचे आहेत. त्यासाठी रेल्वेकडून ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यापूर्वी रेल्वे संबंधित परिसरात होणाऱ्या कामाच्या डिझाईनला मंजुरी देईल. ही मंजुरीही आतापर्यंत मिळालेली नाही. पुलाचे ५४ पाईल (खड्डे) खोदून जवळपास १३ पाईप कॅप चढविण्यात आल्या आहेत. आरई वॉलचे कामही आताच सुरू झाले आहे. पिल्लर तयार झाल्यानंतर त्यावर गर्डर (सिमेंट स्लॅब) टाकण्याचे काम होईल. परंतु गर्डर कास्टिंगची सुरुवात आतापर्यंत झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे गडकरींनी दिलेल्या मुदतीत कामाचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचीही इतर प्रकल्पांसारखीच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार