शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

गुन्हेगारांवर धाक ठेवून काम करा

By admin | Updated: August 27, 2016 02:05 IST

शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे.

पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पदभार सांभाळला नागपूर : शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे. तो तसाच कायम ठेवून प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने काम करा, असा हितोपदेश शहराचे नवीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी येथील पोलीस अधिकाऱ्यांना केला. डॉ. व्यंकटेशम यांनी आज सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालय गाठले. मावळते आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना आयुक्तपदाची सूत्रे सोपवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छोटेखानी बैठकीनंतर त्यांनी लगेच पोलीस जिमखाना गाठला. येथे पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी पहिल्याच बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने तणावमुक्त काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, नागपूर शहर पोलिसांचे सर्वत्र नाव आहे. त्याला बट्टा लागू नये. अवैध धंदेवाले, गुन्हेगार यांच्यावर धाक ठेवूनच काम करा. गुन्हेगारी अवैध धंद्यांमुळेच फोफावते. त्यातून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि दीर्घकाळ कटू आठवणी ठेवणाऱ्या (कोपर्डीसारख्या) घटना घडतात. त्या घडू नये, यासाठी आम्ही सदैव तत्पर असले पाहिजे. स्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले आणि कोणत्याही भागात अवैध धंदे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले व्यंकटेशम स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी २६ / ११ चा हल्ला, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळीच्या गुंडांचा केलेला सफाया, राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांचे डिजिटलायझेशन, मुंबई विमानतळावरील सोन्याची तस्करी, बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा आदी प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून लक्षवेधी भूमिका वठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरातही त्यांची कारकीर्द ते कशाप्रकारे लक्षवेधी करतील त्याकडे पोलीस दलासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)मैत्रीपूर्ण संबंध जोपासामावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज निरोप घेताना येथील अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. कुटुंबप्रमुखाला प्रसंगावधान राखत काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. ते व्यक्तिगत नसतात. त्यामुळे आपण आपले काम अधिक निष्ठेने करावे, असे सांगतानाच सामान्य नागरिकांसोबतच प्रसारमाध्यमांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, असा सल्लाही यादव यांनी यावेळी दिला.