शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

लाकूडविरहित अंत्यसंस्कार : नागपुरात लाकडाऐवजी घाटावर मिळणार गोवऱ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:28 IST

महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली.

ठळक मुद्देमनपाच्या घाटावर नवा नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली. विविध जळाऊ मिश्रणापासून तयार केलेल्या गोवऱ्या घाटावर नि:शुल्क मिळणार असून आता लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे.अंत्यविधीसाठी मनपाच्या काही घाटावर नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून दिली जातात. परंतु याचा खर्च मनपा प्रशासनाला परवडणारा नाही. शिवाय, पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण व्हायचा. दरम्यानच्या काळात विद्युतदाहिनी स्थापन करण्यात आली. मात्र अजूनही नागरिकांनी ही पद्धत फारशी स्वीकारली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जातो. एका शवदहनासठी साधारण ३०० ते ५०० किलो लाकडांचा वापर होतो. शव जाळल्यावर उरलेली रक्षाही पर्यावरणाला पूरक नाही. ही राख नदीचा प्रवाह प्रदूषित करत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यावर उपाययोजना व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गोवऱ्या पर्यायी सोय करण्यात आली आहे. या गोवऱ्या जळाऊ मिश्रणापासून बनविण्यात आल्या आहे. या गोवऱ्या म्हणजे सहा ते १२ इंचाचे गोळे आहेत. या गोवºया घाटावर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून हा नवा नियम सर्व घाटावर लागू करण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी बसपाचे उत्तम शेवडे यांनी त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांवर या गोवऱ्याच्या मदतीनेच अंत्यसंस्कार केले. याला अरुण साखरकर, शंकर थूल, विनोद सहकाटे यांनी सहकार्य केले. शेवडे यांचे म्हणणे आहे, मनपाने लाकडे वाचविण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. पर्यावरणासाठी लाकूडविरहीत अंत्यसंस्कार गरजेचे आहे. या गोवऱ्या जळाऊ साहित्यापासून केल्याने त्या लाकडासारख्याच जळतात.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका