शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रेल्वे अंडरब्रीजसाठी महिला रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:45 IST

नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे

ठळक मुद्देरेल रोकोचा इशारा : आठ महिन्यांच्या विलंबामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे स्थानिक महिलांनी त्याचा विरोध करून हे काम त्वरित पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा तसेच रेल रोको करण्याचा इशारा दिला.सन २०१५ मध्ये मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या खाली आंदोलनकर्त्यांनी प्रदीर्घ उपोषण केले होते. या उपोषणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन रेल्वेच्या अधिकाºयांना खडसावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अंडरब्रीजच्या कामात आता फक्त रेल्वे ट्रॅकच्या घाडी गडर टाकण्याचे काम शिल्लक आहे. हे काम आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. आंदोलनकर्त्यांनुसार रेल्वे रुळाखाली गडर टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी बाकी आहे. त्यांच्या मते कुठे, कोणत्या स्तरावरील काम थांबले आहे हे पाहणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. काम सुरू केल्यानंतर ते मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. हे काम २० नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. ते २०१६ मध्ये पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु काम कासवगतीने सुरु असल्यामुळे २०१७ पर्यंत ते पूर्ण झाले नाही. आंदोलनादरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्ता शंभु सिंह, साकिब खान, पांडुरंग ठाकरे यांच्यासह किरण बावला, नीलम, आशा भागरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अपंगांसाठी कठीणतिरुपतीनगर येथील रहिवासी ज्योती महाजन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अपंग आहे. त्याला शाळेत व ट्यूशनला जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे त्याला आणि इतर महिलांना मोठा त्रास होत आहे.एटीएमकडे जाण्यासाठी त्रासकल्पना बैस, मीरा चुरागळे आणि रमावती सिंह यांनी सांगितले की, रेल्वे अंडरब्रीज तयार करण्यात जी उदासीनता दाखविण्यात येत आहे. त्यामुळे झिंगाबाई टाकळीत एटीएममधून पैसे काढण्यासाठी रुळ ओलांडावा लागत आहे. लांब फेरा घालण्यामुळे वाहनातील पेट्रोल खर्च होत आहे. सर्व्हिस रोडवरून पुलापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक धोका राहतो आणि वेळही खूप लागतो. अशा स्थितीत मुलांमुळे अधिक चिंता वाटते.या भागातील नागरिकांना आहे त्रास४रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे ओमनगर, ओम साई नगर, आर्य नगर, तिरुपति नगर कॉलनी, शंभू नगर, गायत्री नगर, बाबा फरीदनगर, नारा रोडकडील नागरिक त्रस्त आहेत.