शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश द्यावा

By admin | Updated: January 31, 2016 03:10 IST

शनी शिंगणापूर येथील मूर्तीच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’मध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी समोर येत आहे.

मुस्लिम राष्ट्रीय मंचची भूमिका : ‘बीफ पार्टी’च्या विरोधात ‘मिल्क पार्टी’ उपक्रम राबविणारनागपूर : शनी शिंगणापूर येथील मूर्तीच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’मध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी समोर येत आहे. या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने महिलांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. हाजी अलीच नव्हे तर कुठलाही दर्गा आणि मशिदीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे अयोग्यच असल्याचे मत मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल यांनी व्यक्त केले. नागपूर येथे आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.इस्लाम धर्मानुसार मक्का व मदिना येथील मशिदी सर्वात जुन्या मानल्या जातात. परंतु येथे महिलांना प्रवेशबंदी नाही. देशातीलदेखील अनेक मशिदी तसेच दर्ग्यांमध्ये महिलांना प्रवेश आहे. परंतु काही ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतो, हे अयोग्य आहे. हे समानतेचे युग आहे. महिलांना त्यांचा हक्क दिलाच पाहिजे. मशीदीमधील पावित्र्य राखण्यासाठी महिलांना मशिदीमध्ये ‘हिजाब’ (बुरखा घालून) ठेवून जाणे अपेक्षित आहे असे अफझल म्हणाले. यावेळी सहसंयोजक विराग पाचपोर, लतिफ मगदूम हे उपस्थित होते.‘बीफ’बाबत पसरवला जात आहे गैरसमज‘बीफ’ खाल्ल्यानंतर ‘जन्नत’ मिळेल असे इस्लाम धर्मात कुठेही नमूद नाही. परंतु तरीदेखील अशा आशयाच्या गोष्टी पसरवून औवेसी बंधूंसारखे लोक समाजात गैरसमज पसरवत आहेत. ‘बीफ पार्टी’च्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे ‘मिल्क पार्टी’ करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापासून याची सुरुवात होईल. या उपक्रमाअंतर्गत गायीचे दूध जमा करून ते घराघरांमध्ये वाटण्यात येईल व गाईचे महत्त्व सांगण्यात येईल, अशी माहिती मोहम्मद अफझल यांनी दिली. असहिष्णुता असती, तर राम मंदिर झाले असतेदेशात असहिष्णुता पसरल्याची ओरड करण्यात येते. परंतु मुळात अशी अजिबात स्थिती नाही. जर देशातील ८० कोटी हिंदूंनी ठरविले तर अयोध्येत राम मंदिर कधी पण उभे राहू शकते. परंतु सहिष्णुतेमुळेच मुस्लिमांची बाजूदेखील ऐकून घेतली जात आहे, असे अफझल म्हणाले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अनेक पक्षांनी मुस्लिम समाजाला धोका दिला आहे. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. देशातील मुस्लिमांचा ‘डीएनए’ हा बाबर किंवा गझनी यांच्याशी नाही तर राम आणि देशातील लोकांशी जुळतो, असे धाडसी विधानदेखील त्यांनी केले.