शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

महिलांची एकजूट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:20 IST

भारतीय चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत एकूणच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहे.

ठळक मुद्देभय्याजी खैरकर : बौद्ध विहार प्रतिनिधींची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत एकूणच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहे. परंतु समाजातील चातुर्वर्ण्य मानसिकता अजूनही गेलेली नाही. त्यामुळे आजच्या काळातही महिलांना त्यांच्या हक्कापासून डावलले जाते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील परंतु महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याच्या संकुचित मानसिकतेतून अजूनही महिलांवर अन्याय होत आहे. या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी समस्त महिलांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर यांनी येथे केले.लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल, मैत्री संघ, संथागार फाऊंडेशन यांच्यातर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात बौद्ध विहार प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. सरोज आगलावे, डॉ. वीणा राऊत, वामन सोमकुंवर, ममता बोदेले, सचिन मून, पुष्पाताई बौद्ध, प्रा. माधुरी गायधनी, एम.एस. जांभुळे, प्रा. विशाखा कासारे प्रामुख्याने उपस्थित होते.भय्याजी खैरकर म्हणाले, आज २१ व्या शतकात महिलांवरील अत्याचारासाठी एकजुटीची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. परंतु आंबेडकरी चळवळीतील महिलांनी ७५ वर्षांपूर्वीच महिलांच्या प्रश्नांवर ऐतिहासिक महिला परिषद भरविली होती. त्या परिषदेला तब्बल २५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्या ऐतिहासिक महिला परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले होते. त्या काळात २५ हजार महिला एकजूट होऊ शकतात तर आज का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सरोज आगलावे, एम.एस. जांभुळे, ममता बोदेले, प्रा. विशाखा कासारे, डॉ. वीणा राऊत यांनीही मार्गदर्शन केले. संचालन नीना राऊत यांनी केले. वामन सोमकुंवर यांनी आभार मानले.दीक्षाभूमीवर होणार राष्ट्रीय महिला परिषद१९४२ ला ऐतिहासिक महिला परिषद पार पडली. त्या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले होते. त्या परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २२ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दीक्षाभूमीवर राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातील एक लाख महिला सहभागी होणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून बैठक-सभा घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक बोलावण्यात आली होती.