शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

महिला उद्योजकाने खेळला २५०० कोटींचा डाव

By admin | Updated: January 14, 2016 03:35 IST

उपराजधानीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा डबाबंद कारभार चालतो. यात शेअर आणि वस्तू यांच्या खरेदी विक्रीमध्ये सट्टेबाजी केली जाते. याचे मूळ खोलवर आहे.

डबाबंद कारभाराचे वास्तव : दलालाशी वाद झाल्याने उघडे पडले पितळजगदीश जोशी नागपूरउपराजधानीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा डबाबंद कारभार चालतो. यात शेअर आणि वस्तू यांच्या खरेदी विक्रीमध्ये सट्टेबाजी केली जाते. याचे मूळ खोलवर आहे. ते किती खोलवर आहेत, याची माहिती एका महिला उद्योजकाच्या कारभारामुळे उघडकीस आली आहे. या महिला उद्योजकाने एका वर्षात तब्बल २५०० कोटी रुपयांची सौदेबाजी केली. सुरुवातीला नफा कमावणाऱ्या या महिला उद्योजकास नंतर तोटा होऊ लागताच तिने दलालाला परतावा करण्यास नकार दिला. यामुळे हे प्रकरण समोर आले.पश्चिम नागपूर येथील रहिवासी असलेली ही महिला उद्योजक ऊर्जा आणि खनिज उद्योगाशी संबंधित आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा उद्योग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेला आहे. संबंधित शेअर दलालाशी एका दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून तिची ओळख झाली. या महिलेने सुद्धा शेअर ट्रेडिंगमध्ये रुची दाखविली. यानंतर तो दलाल या महिला उद्योजकाच्यावतीने खरेदी-विक्री करू लागला. सुरुवातीला दोघांमधील व्यापारी संबंध चांगले राहिले. परतावा सुद्धा वेळेवर झाला. महिला उद्योजकाने मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केल्याने दलालाला सुद्धा तिच्यावर विश्वास बसला. ती एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य असल्याने तिला उधार देण्यात दलालाला कुठलाही धोका वाटला नाही. सूत्रानुसार २०१४ मध्ये एका वर्षात या महिलेने जवळपास २५०० कोटी रुपयांची खरेदी विक्री केली. या कालावधीत दलालीचे जवळपास ८ कोटी रुपये महिलेवर थकीत होते.शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसाननागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान होत असल्याने महिला उद्योजकाचा मोहभंग झाला. तिने हळूहळू खरेदी विक्री बंद केली. याची माहिती होताच संबंधित दलालाने महिला उद्योजकास आपली थकीत रक्कम परत मागण्यास तगादा लावला. हळूहळू करून थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन देत त्याला तिने शांत केले. परंतु वेळ होऊनही महिलेने त्याला पैसे परत केले नाही. त्यामुळे दलाल दु:खी झाला. दलाल आणि महिला उद्योजकाची सामाजिक पार्श्वभूमी एकच असल्याने त्याने प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून वाद सोडवण्यास सांगितले. अनेक बैठका झाल्या परंतु कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दलालाला राग आला. त्यानंतर त्यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले. दलालाचे कर्मचारी वसुलीसाठी थेट महिला उद्योजकाच्या घरी पोहोचले. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावून दलालाच्या कर्मचाऱ्यास तुरुंगात धाडले. थकीत रक्कम परत करण्याऐवजी तुरुंगात पाठविल्याने दलाल संतापला. त्याने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कंबर कसली. त्याने पोलिसांना खरा प्रकार सांगितला. आता पोलीसही कायदेशीर बाबींवर विचार करीत असून यातून योग्य मार्ग शोधत आहे.(प्रतिनिधी)