शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अधिकाऱ्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेला जिल्ह्याचे मिनी मंत्रालय मानल्या जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग महत्वपूर्ण मानला जातो. ...

नागपूर : जिल्हा परिषदेला जिल्ह्याचे मिनी मंत्रालय मानल्या जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग महत्वपूर्ण मानला जातो. शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. पण जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सांभाळण्यासाठी अधिकारीच नसल्याने संपूर्ण योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकरी सोयी, सवलती, अनुदानासाठी डोळे लावून बसले असताना, बिना सेनापतींचा सभापती हतबल झाला आहे.

मनुष्यबळाचा अभाव, अधिकाऱ्यांची कमतरता त्यामुळे कामे करणार कशी, अशी खंत खाजगीमध्ये व्यक्त करीत सभापती वैद्य यांनी लक्षच देणे सोडले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी (वर्ग -१) हे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग -१) हे पद ३ महिन्यापासून रिक्त आहे. तर जिल्हा कृषी अधिकारी सामान्य (वर्ग -२) व जिल्हा मोहिम अधिकारी (वर्ग-२) ही पदे ३ ते ४ वर्षापासून भरलेली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कृषी विभागात या महत्वाच्या पदावरील अधिकारीच नसल्याने अख्खा कारभार वाऱ्यावर आहे.

विशेष म्हणजे सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात खतांची उपलब्धता, बियाण्यांचा पुरवठा, बोगस बियाण्यांची विक्री, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी ही सर्व प्रक्रिया ठप्प पडली आहे. अधिकारीच नसल्याने कृषी समितीच्या बैठका वांझोट्या ठरत आहे.

- लोकप्रतिनिधींचेही दूर्लक्ष

जिल्हा परिषदेचा कारभार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. पण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला नियमित पशुसंवर्धन अधिकारी नाही. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या कृषी विभागाला नियमित अधिकारी नाही. नेते, मंत्र्यांकडे लोकप्रतिनिधी व्यक्त होत नाही. व्यक्त झाले तरी वेदना कळत नाही. त्यामुळे कृषी विभाग सेनापतींविना काम करतो आहे.